पूर्णेकरांसाठी शनिवारी सिद्धेश्वर धरणातून २ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

Spread the love
प्रशासनाचे दिला सतर्कतेचा ईशारा;नदीपात्रात कोणीही उतरू नये

पूर्णा(प्रतिनिधी)

सिद्धेश्वर जलाशयातून पूर्णा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी नदीपात्रातील बंधा-यात शनिवारी ता.३ मे रोजी दुपारी १२  वाजता सहा वक्र  दरवाज्यातून पूर्णा नदीच्या पात्रात सुमारे २ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असुन, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सं.बा.बिराजदार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
     मागील काही दिवसांपासून पालीकेला पाणी पुरवठा करण्या-या कोल्हापूरी बंधा-यात थेट पूर्णा नदीच्या पात्रात सिद्धेश्वर जलाशयाच्या सहा वक्र दरवाज्यातून  शनिवारी ३ में रोजी दुपारी १२ वाजता दरवाजे ३० से.मी.ने (एक फुट) उचलुन सुमारे २ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.पूर्णा पाटबंधारे विभागाने यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
      सिद्धेश्वर जलाशयातुन हे पाणी पूर्णा नदीच्या पात्रातून सोडण्यात येणार असल्याने दरम्यान नदी काठच्या परिसरातील गावाच्या लोकांनी सतर्क राहाण्याबाबत तसेच नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, जनावरे सोडू नये किंवा कोणतीही जिवित वा वित्तहानी होणार नाही याबाबत सर्व पुरप्रवण क्षेत्रातील गावाना सावधानतेचा ईशारा देण्या बाबत पूर्णा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजय बिराजदार यांनी ता.२ में रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी तसेच हिंगोली यांना लेखी पत्र देऊन सुचित केले आहे.सदरील पाणी येत्या दोन दिवसांत कोल्हापूरी बंधा-यात पोहचेल. मागील काही दिवसांपासून शहरात निर्माण झालेली निर्जळी पासुन  नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता तसेच पाणीपुरवठा विभाग प्रमुखावर कारवाई होणार..?

पालीकेच्या पाणीपुरवठा विभागातील  अभियंता व पाणी पुरवठा विभाग प्रमुख यांच्या गलथान कारभारामुळे पालीकेला दिड महिन्यात दुसऱ्यांदा पाणी मागवावे लागले आहे.यापुर्वी ४ मार्च रोजी पालीचा प्रशासनाने दहा लाखांहून अधिक रक्कम पाटबंधारे विभागास पाणीपट्टी देऊन बांधा-यात २ हजार क्युसेस पाणी मागवले होते. मात्र पालीकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या  नियोजन शुन्य व गलथान कारभारामुळे बहुतांश पाण्याचा अपवय झाला. शिवाय यांचा नाहक फटका नागरिकांना बसला असुन,निर्जळीस सामोरं जावे लागलं आहे.पालीकेचे प्रशासक तसेच मुख्याधीकारी कामात कुचराई करणाऱ्या तसेच जनतेच्या पैशाचा अपव्यय करणा-या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता तसेच पाणीपुरवठा विभाग प्रमुख यांच्यावर कारवाई करणार काय याकडे आता लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page