पूर्णा तालुक्यात विजेचा थयथयाट;आहेरवाडी ५जनावरे दगावली;शेत आखाडा जळाला

Spread the love

५ गायी भाजलेल्या पशुधनावर उपचार सुरू; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

पूर्णा प्रतिनिधी

सोसायटयाच्या वाऱ्यासह आलेल्या चक्रीवादळ व दरम्यान पडलेल्या विजे मुळे पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे एक शेत आखाडा जळून खाक झाला आहे तर आखाड्यात बांधलेली ५ जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत तर ५ जनावरे भाजले आहेत घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून त्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे.

पूर्णा तालुक्यात सोमवारपासून चक्री वादळ सदृश्य सोसायटयाच्या वाऱ्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे तर यामध्ये सर्वात जास्त नुकसान महावितरणचे झाले आहे अनेक ठिकाणी झाडे उडून पडले आहेत, विजेचे खांब वाकले आहेत ,शहरातील मोठे मोठे होल्डिंग उखडून पडले आहेत, अनेकांच्या घरावरची पत्रे उडून गेली आहेत. सतत दोन दिवसांपासून तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याने हाहाकार उडूवून दिला आहे. मंगळवारी ता.६ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे दिगंबर नामदेवराव मोरे गट नं ३०३ येथे शेताकडे वीज पडली. त्यांच्याकडे बांधलेले सुमारे ३० जनावरांपैकी लाखों रुपयांची किंमत असलेल्या २ गाई ३ वासरे जागीच दगावली तर ५ गाई गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विज पडल्याची माहिती होताच गावातील काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन गोठ्यात बांधलेल्या अन्य जनावरांची सुटका केली. घटनेची माहिती मिळतात

बुधवारी सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कचरे डॉक्टर श्रीमती दुधारे, फौजदार आमिर चाऊस यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत जनावर ताब्यात घेत तरी तपासणी केली. उर्वरित पाच गंभीर भाजलेल्या गाईंवर त्यांनी उपचार सुरू केले आहेत. वसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. घटनेमध्ये शेत आखाड्यावरील शेतकऱ्यांच लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे तसेच आखाड्यावर काम करणाऱ्या चाल गड्याचे देखील ग्रह उपयोगी साहित्य जळून खाक झालेले आहे. जनाने घटनेचा पंचनामा करून पिढी त्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी आहेरवाडी करातून होत आहे.

You cannot copy content of this page