नदीपात्रात पोहण्यास गेलेला ११ वर्षीय बालक बुडाला
कानडखेड शिवारातील घटना;शोध कार्य मोहीम सुरू
पूर्णा/ प्रतिनिधी
शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा नदीवरील रेल्वे पुल तसेच कानडखेड जवळील बाॅम्बे पुलाच्या मधोमध असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावंडापैकी एक ११ वर्षीय बालक बुडाला असल्याची घटना मंगळवारी ता.६ रोजी सकाळी ११;३० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनास्थळी महसूल, पोलीस,आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून पाण्यात बुडालेल्या बालकाचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.
अजय अशोक वैद्य (वय ११) रा.कानडखेड ता.पूर्णा असं त्या बुडालेल्या बालकाचे नाव आहे.तो आणी त्याचा मोठा भाऊ पांडुरंग अशोक वैद्य हे दोघे सकाळी घरून जवळच असलेल्या पूर्णा नदीच्या बाॅम्बे ब्रिज जवळ शेळ्या घेऊन नदी पात्रात गेले होते.सकाळी ११;३० वाजण्याच्या सुमारास दोघे भाऊ अन्य काही मुलांसोबत पोहत होते. पूर्णा नदीपात्रात दि.३ रोजी सिद्धेश्वर जलाशयातुन सुमारे २ हजार पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे त्यामुळे पूर्णा नदीचे पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.सर्व मुले पाण्यात पोहत असताना अजयला पाण्याचा अंदाजन आल्याने तो पोहत असताना पाण्यात बुडत होता.त्याच्या सोबत असलेल्या मुलांनी यावेळी एकच गदारोळ केला.त्यावेळी त्याचा भाऊ पांडुरंग त्यांच्या मदतीला धावून गेला नदीपात्रात पाणी जास्त प्रमाणात असल्याने तोही बुडत होता दरम्यान नदीकाठी जनावरे चालत असलेले बाबुराव नरहरी लांडे यांनी हा प्रकार पाहताच थेट नदीपात्राकडे धाव घेऊन नदीपात्रात उडी घेत या दोन्ही मुलांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु यास वाचून असताना यश आले परंतु अजय हा त्यांच्या हाताला लागला नाही.
करण्याची माहिती गावातील ग्रामस्थांना मिळताच गावातील शेकडो तरुण अजयच्या शोधासाठी नदीपात्रात उतरले होते प्रसंगी घटनेची माहिती मिळताच ना.तहसीलदार प्रशांत थारकर, तलाठी गणेश गोरे, पो.नि. विलास गोबाडे, जमादार, रमेश मुजमुले यांनी घटनास्थळी गाव घेऊन पाहाणी केली. दरम्यान पूर्ण येथील आपत्ती व्यवस्थापन विभागातील अग्निशामक दलाचे गणेश रापतवार, अमजद कुरेशी, सोनाजी खिल्लारे, दीपक गवळी आदींनी तसेच स्थानिक मच्छीमारांनी व गावातील तरुणांनी अमोलच्या शोधासाठी मागील चार ते पाच तासापासून शोध कार्य हाती घेतले आहे. चार तासांच्या अथक प्रश्नानंतरही शोधूनही अद्याप पर्यंत अमोलचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नसल्याचे समजते.