संशोधनासाठी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जातील -मुख्यमंत्री फडणवीस

Spread the love

परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात ५३ व्या संयुक्त कृती संशोधन विकास समीतीची बैठक

परभणी ता.२९ मे (प्रतिनिधी)

शेतीच्या वास्तवाशी थेट नाळ जुळावी, यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.राज्यातील कृषी संस्थांतील अधिकारी, संशोधक, शास्त्रज्ञ थेट शेतक-यांच्या बांधावर जातील. तेथे प्रत्यक्ष चर्चा करतील, समस्यांचा अभ्यास करतील आणि प्रात्यक्षिक संशोधन करतील.या नव्या योजनेची अंमलबजावणी पुढील पंधरा-वीस दिवसांत होईल. शास्त्रज्ञ शेतीतील संशोधन कागदावर न करता थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन संशोधन करतील. या योजनेची सुरुवात महाराष्ट्रातून होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

        परभणी कृषी विद्यापीठात आयोजित ५३ व्या संयुक्त कृती संशोधन विकास समीतीच्य कार्यक्रमात बोलत होते.बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, राज्यमंत्री अॅड. आशिष जैस्वाल, कुलगुरु डॉ. इंद्र खा. संजय पाटील रखा. संजय जाधव, आजी. राहुल विटेकर, आ. सतीश चव्हाण, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, सीईओ, नतीशा माथुर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव, कुलसचिव संतोष वेणीकर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, राज्याचे प्रधान कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह कार्यकारी परिषद सदस्य प्रविण देशमुख आदींची उपस्थिती होती.

      पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, प्रत्येक गावात ३ ते ४ कृषी अधिकारी/शास्त्रज्ञांची टीम पाठवली जाईल. हे अधिकारी शेतक-यांना मार्गदर्शन करतील, प्रश्नांची उत्तरे देतील आणि प्रत्यक्ष उपाय सुचवतील. शेतीपुढील दोन गंभीर संकटांवर लक्ष फडणवीस म्हणाले, सद्यस्थितीत शेतक-यांपुढे दोन मोठ्या अडचणी आहेत, अल्पभूधारकता: ७९% शेतकरी लहान जमिनीवर शेती करत असल्याने मोठी गुंतवणूक शक्य नाही. हवामान बदल अनिश्चित असल्यामुळे उत्पादनात सातत्य नाही. त्यामुळे या नवीन योजनेचा शेतक-यांना लाभ होणार आहे.

      शेती संशोधनात ‘फील्ड टू लॅब’चा नवा टर्न या योजनेमुळे शेती संशोधनाचा पारंपरिक ‘लॅब टू लँड’चा फॉम्युर्ला उलटून ‘लँड टू लॅब’ होईल. शेतक-यांच्या अडचणी थेट समजून घेऊन, त्यावर वैज्ञानिक उपाय शोधले जातील. ही योजना केवळ सल्लागार नव्हे, तर हातात हात घालून काम करणारी मोहीम असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.शेतीला प्रयोग शाळेच्या चौकटीतून बाहेर काढून, बांधावर आणायचंय हेच खरं ‘फील्ड वर्क’अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीसांनी या नव्या उपक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले.

शेतकरी लाभदायक संशोधन व्हावे-राज्यमंत्री अँड आशिष जैस्वाल

महाराष्ट्र आग्रगण्य स्थानी आहे. कृषीतील प्रगतीचा वेग वाढविण्याची गरज आहे. विद्यापीठांद्वारे शेतकरी लाभदायक संशोधन व्हावे, एआयचा वापर या संशोधनात महत्वाचा ठरेल. विकसित भारत विकसित कृषी या संकल्पावर आधारित काम होणेगरजेचे आहे.

उत्पादन वाढ करताना खर्च कमी करणे गरजेचे-कृषीमंत्री माणीकराव कोकाटे

शेतकऱ्याला त्याच्या बांधावर जावून मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी चांगले वाण शोधणे काळाची गरज आहे.शेतीतील उत्पादन वाढ करत असताना उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी शेतीतील विविध सुधारणा बांधावर जावून शेतकऱ्यांना समजावाव्यात. बदलत्या वातावरणामुळे शास्वती शेती करणं आवश्यक आहे.

You cannot copy content of this page