सावधान;कागदी कपात चहा,गरम पदार्थ विक्रीवर बंदीचे आदेश

Spread the love

परभणीतील सामाजिक कार्यकर्ते स.रफिक पेडगावकर यांच्या मागणीला यश;कॅन्सरसारखे आजार रोखण्यासाठी प्रशासनही सरसावले;बंदीचे आदेश निर्गमित

परभणी(प्रतिनिधी)
चहा,काॅफी,दुध,डिकाशन सह अन्य गरम पदार्थ विक्रीकरण्यासाठी व्यवसाईक मोठ्या प्रमाणात कागदी कपाचा वापर करत आहेत.या कपात गरम पदार्थ टाकल्याने वितळणाऱ्या प्लास्टिक पोटात जाऊन कॅन्सर सारखे दुर्धर आजाराची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.या आजाराच्या कचाट्यात सापडलेल्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे.त्यामुळे परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद रफीक पेडगांवर यांनी जिल्हा प्रशासनाला कागदी कपाच्या वापर रोखण्यासाठी बंदी घालून या बंदीची कडक अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला दि.२३ डिसेंबर रोजी एक निवेदन दिले होते.जिल्हा प्रशासनाने पेडगांवकर यांच्या निवेदनाची दखल घेत. जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना कागदी कपाच्या बंदीबाबत कडक अंमलबजावणी करण्यासाठी आदेश निर्गमित केले आहेत.आता जिल्ह्यातील संबंधित प्रशासन आता कार्यवाही करणार की आदेशाला केराची टोपली दाखवणार याकडे लक्ष लागले आहे.
बंदी

परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद रफिक पेडगावकर, परभणी जिल्हाध्यक्ष यांनी परभणी जिल्हा अधीकारी कार्यालयात निवेदन सादर केले होते, त्यानुसार देशासह राज्यात कॅन्सर सारख्या आजाराचे प्रमाण जास्त वाढत आहे या आजाराना कारणीभुत ठरत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर बंदीचे आदेश देऊन त्यांची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी केली होती.जिल्हा प्रशासनाच्या सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधीकारी संगीता चव्हाण यांनी या अर्जाची दखल घेऊन परभणी जिल्हयात चहाच्या कागदी कणंचा उपयोग अधिक प्रमाणात केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्याअर्थी चहाचे कागदी कप बनवितांना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग केला जातो कागदी कपात गरम चहा टाकल्यावर कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिकचे कण वितळते व प्लास्टिकचे कण पोटात जातात. त्यामुळे कॅन्सर सारखा आजार होउ शकतो त्यामुळे कागदी कपाच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून याची कडक अंमलबजावणी करावी असे आदेश जिल्हा सामान्य प्रशासनाच्या निर्गमित केले आहेत.

स्थानिक प्रशासनाच्या भुमिकेकडे लक्ष

राज्य शासनाने यापुर्वीच कागदी कपाच्या वापरावर बंदी घातली आहे.मात्र जिल्ह्यातील प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे बंदी असतानाही बहुतांश आस्थापना कागदी कप,प्लेट,ग्लास पत्रावळीचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.अधुन मधून प्रशासनाच्या वतीने थातुरमातुर कार्यवाही केली जाते त्यामुळे राज्य शासनाने घातलेल्या या बंदीचा जिल्ह्यात फज्जा उडाला आहे.आता नव्याने जिल्हा प्रशासनाने बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश निर्गमित केले आहेत.या आदेशाला जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर काय प्रतिसाद मिळतो.बंदीची कठोर अंमलबजावणी होते की नाही हे पहाणे औचित्याचे ठरणार आहे.

You cannot copy content of this page