नापीकीला कंटाळून शेतक-याची गळफास लावून आत्महत्या

Spread the love

पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथील घटना पूर्णा(प्रतिनिधी)

येथिल पूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नांदगाव येथे एका ३५ वर्षिय तरुण शेतकऱ्याने सततच्या नापीकीला कंटाळून छताच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रंरणी पुर्णा पोलिस ठाण्यात ता.१३ एप्रिल रोजी घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

विजय मंचकराव भालेराव (वय ३५) रा.नांदगांव ता.जि.परभणी असं त्या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती असी की,ते आपल्या कुटुंबासह नांदगाव येथे राहत असत त्यांच्या नावे ६ ते ७ एकर शेती आहे.निसर्गाचा लहरीपणा शेतीत सतत होणारी नापीकी यामुळे ते अर्थिक विवंचनेत सापडले होते.खाजगी तसेच नातेवाईक मित्र मंडळी कडून उसणवारीचा व्यवहार केल्याने डोक्यावर झालेले देणं कसं फेडावे या विवंचनेत त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली.त्यांनी आपल्या राहत्या घरी छताच्या आडूला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पूर्णा ठाण्यात नुकतीच नोंद झाली आहे.सदर घटना ही १० एप्रिल गुरुवार रोजी घडली असून दोन दिवस आत्महत्याचा पत्ताच लागला नव्हता.दरम्यान , त्यानंतर एका बंद खोलीतून दुर्गंधीयुक्त वास येत असल्यामुळे दरवाजा मोडून पाहीले असता.सडक्या अवस्थेत युवक शेतकऱ्याचा मृतदेह छताच्या आडूला गळफास घेतलेल्या अवस्थेत पोलीसांना आढळून आला.दरम्यान, कैलाश भालेराव यांच्या तक्रारीवरून पूर्णा पोलिस ठाण्यात मृत्याचा गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास जमादार श्याम काळे‌ करीत आहे.

You cannot copy content of this page