विषाचा घोट घेऊन कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील घटना;पोलीसांत घटनेची नोंद
पूर्णा(प्रतिनिधी)
सततची नापीकी व डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर त्यातच मुलांचे शिक्षण संसाराचा गाडा कसा हाकावा या चिंतेने असलेल्या पुर्णा तालुक्यातील चुडावा येथील एका ५० वर्षीय शेतकऱ्यांने आपल्या शेत आखाड्यावर विषाचा घोट घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
गुणाजी डीगाबंर पवार वय ५० वर्ष रा.चुडावा ता. पुर्णा जि.परभणी.असं त्या मयत शेतकऱ्यांचे नांव आहे.त्यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांचे नातेवाईक पंकज पवार यांनी चुडावा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.मयत गुणाजी पवार हे शेतकरी चुडावा येथे आपल्या कुटुंबीयांसह राहून शेती व्यवसाय करतात त्यांची येथून जवळच असलेल्या आलेगांव शिवारातील गट नंबर २२३ मध्ये शेत जमीन आहे.मागील काही वर्षांपासून शेतात दुष्काळ, अतिवृष्टी मुळे सततची नापीकी होऊन उत्पादन घटले परिमामी अर्थिक अडचणीं वाढत होत्या यातुन सुटका मिळवण्यासाठी त्यांनी बँका तसेच काही मित्र नातेवाईक यांच्या कडून देखील उधार उसनवारी केली.दिवसेंदिवस डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता.मुलांचे शिक्षण कसे करावे कुटुंबाचा गाडा कसा हकावा या विवंचनेत ते मागील काही दिवसांपासून होते.दरम्यान,शुक्रवारी ता.१४ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते घरुन आलेगांव शिवारातील शेतात गेले होते.दरम्यान ते रात्री घरी उशिरा पर्यंत परतलेले नसल्यामुळे कुटुंबीयांनी रात्री ११;३० वाजण्याच्या सुमारास शेतात जाऊन पाहिले असता त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून आले.अशी खबर चुडावा पोलीसांना देण्यात आली.घटनास्थळी चुडावा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरसिंह पोमनाळकर आदींनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांना सुपूर्द केला आहे.चुडावा पोलिस ठाण्यात याप्रकरणी शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली असल्याचे समजते.