शेतकऱ्यांनी चुडाव्यात राज्य महामार्ग ६१ रोखला

Spread the love

पिकविमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनाही रस्त्यावर; रास्ता रोको मुळे तासभर वाहतूक खोळंबली; शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन

पूर्णा (प्रतिनिधी)

लोंबार्ड पीक विमा कंपनीकडे खरीप हंगाम २०२४ मध्ये भरलेल्या पिक विम्यानंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल करूनही कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही म्हणून संतापलेल्या शेतकऱ्यांनी चुडावा येथे रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.

मागील वर्षी २०२४ सालात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.पिकं काढणी पुर्वी हजारो शेतक-यांनी.या संदर्भात आयसीआयसी लोंबार्ड पीक विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतू, त्या कंपनीने तक्रारीस केराची टोपली दाखवली.यामुळे नुकसान भरपाई पासून हजारो शेतकरी वंचित राहीले.. याकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी ता.२ में रोजी तालुक्यातील चुडावा येथे हजारो शेतकरी पिक विमा कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते.यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत राज्य महामार्ग क्र.६१ सुमारे एक तास रोखून धरला.यामुळे मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसून आले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रेम देसाई, सुधीर देसाई, तुळशीराम सुर्यवंशी, अंकुश देसाई, मारोतराव देसाई प्रभाकर देसाई, भगवान देसाई, जानोजी देसाई, नागेश देसाई, श्रीरंग देसाई आदी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, सपोनि नरसिंग पोमनाळकर यांनी बंदोबस्त ठेवला होता. तर नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी निवेदन स्वीकारले.

You cannot copy content of this page