पूर्णेत वादळी वाऱ्याच्या तडाख्याने रात्रभर बत्ती गुल,होर्डींग्ज उखडले,झाडे उन्मळली,अनर्थ टळला
पूर्णा(प्रतिनिधी)
शहरासह तालुक्यातील बहुतांश भागाला सोमवारी ता.५ में रोजी सायं पाच वाजेच्या सुमारास चक्री वादळ वार्याच्या तडाख्याने कच्च्या घरांवरील पत्रे, दुकानदारांचे बोर्ड, रस्त्या रस्त्यांवरील होर्डींग तसेच काही ठिकाणी झाडेसुध्दा उन्मळून विद्युत वाहिन्यांवर कोसळली. या तडाख्याने महावितरण कंपनीला मोठा फटका बसला असुन,संपूर्ण शहराचा वीज पुरवठा सुध्दा खंडीत झाला. मंगळवारी पहाटे उशीरापर्यंत बहुतांशी भागाचा वीज पुरवठा पूर्णतः बंदच होता.
सोमवारी सायंकाळी अचानक वातावरण बदलल्यानंतर सोसाट्याचे वारे वाहू लागले अन् वादळी वार्याने अक्षरशः काही मिनिटं संपूर्ण शहरास झोडपून काढले. या वार्यामुळे ठिकठिकाणच्या कच्च्या घरावरील पत्रे हवेत भिरकावली, शेड कोसळले. तर दुकानांवरील पाट्यासुध्दा हवेत भिरकावल्या गेल्या. कहर म्हणजे शहरातील बोर्डीकर प्लॉट, कुंभार गल्ली, रेल्वे काॅलनी,एकबालनगर,मस्तानपुरा, सिद्धार्थ नगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर भागात अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडं उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी वाहीन्या तुटून जमीनीवर पडल्या. आनंदनगर,झिरोटीपाईन्ट, शहरातील रस्त्या रस्त्यांवरील होर्डींगसुध्दा ठिकठिकाणी कोसळले.तर ऐन तपोवन एक्सप्रेस स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरयेत असताना निर्माणधीन दाद-यावरील पत्रे प्लॅटफॉर्म वर पडली . मात्र यावेळी सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही.सबंध रस्त्यावरसुध्दा हेच चित्र कायम होते.विज पुरवठा करणाऱ्या तारा तुटल्या यामुळे शहरातील बत्ती पहाटे पर्यंत गुल झाली होती.यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रामगीरवार , अभियंता वसमतकर, अभियंता बोडखेसह पिंटु नवघरे,शे.खाजा, पांडुरंग चिमटे,शे ईरशाद,मारोती जोगदंड सह महावितरण कंपनीचे कर्मचारी विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मध्यरात्री शहरात तळ ठोकून वीज दुरुस्तीची कामे करत असल्याचे दिसून आले.दरम्यान, दिवसभर कडाक्याचे उन होते. हवेत कमालीची उष्णता होती. रात्री उशीरासुध्दा उकाड्याने नागरीक अक्षरशः हैराण होते