संविधानातील कायद्याने महीलांना संरक्षण दिले आहे-ॲड.राजेश भालेराव
पूर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त ” महिला कायदे विषयक जागृती “शिबीर
पूर्णा(प्रतिनिधी) —
भारतीय संविधानाच्या विविध कायद्याद्वारे महिलांना संरक्षण दिले असून समतेची वागणूक मिळावी ,स्त्री – पुरुष समानता निर्माण व्हावी अशी तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली आहे. स्त्रियांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत स्त्रियांना भारतीय संविधानाच्या कायद्याने संरक्षण दिले असल्याचे प्रतिपादन ॲड .राजेश भालेराव यांनी केले.
पूर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त ” महिला कायदे विषयक जागृती “शिबीर घेण्यात आले यावेळी व्याख्यानात अँड भालेराव प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की, समाजात वावरताना स्त्री – पुरुष असमानता अनेक प्रसंगी पाहायला मिळते. भारतीय महिलांना संरक्षण देणाऱ्या विशेष कायद्याची भारतीय संविधानात तरतूद असून त्यामुळे भारतीय महिला सन्मानाने आपले जीवन जगता येत आहे.लिंग निदान करणे , स्त्री अर्भकाचा गर्भपात करणे यावर बंदी घातली असून बालविवाह बंदी, बालकामगार कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, पोटगी ,सार्वजनिक ठिकाणी समान वेतन कायदा अशा वेगवेगळ्या कायद्याद्वारे स्त्रियांच्या जीवनात सन्मान वाढला आहे असेही ते म्हणाले . स्त्रियांनी देखील जास्तीत जास्त शिक्षण घेऊन कायद्याचा अभ्यास केला पाहिजे व सन्मानाने जगायला शिकले पाहिजे असे त्यांनी आपल्या सविस्तर मार्गदर्शनात सांगितले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार तर मंचावर डॉ. भीमराव मानकरे उपस्थित होते.
याप्रसंगी तृप्ती किरगे व परमेश्वर शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दीपमाला पाटोदे यांनी मांडले.सूत्रसंचालन शिवानी जोगदंड तर आभार प्रा.वैशाली लोणे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी छकुली परडे, शिवानी जोगदंड, तृप्ती किरगे, प्रतिक्षा मुळे,श्रुती नांगरे,महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.