पालीकेच्या पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार;होळी,रमजान सण पाण्याविना
पूर्णेत निर्जळी;२० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प
पूर्णा(प्रतिनिधी)
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील पाणीपुरवठा अभियंता व कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या भोंगळ कारभाराचा फटका पूर्णेतील नागरिकांना बसत असून मागील वीस दिवसांपासून यांना त्या कारणावरून नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना अवाच्या सव्वा पैसे देऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे. प्रतिमा असलेल्या वसाहती मधील नागरिकांना पाणी नसल्यामुळे वन वन भटकंती करावे लागत आहे.
सध्या रमजान महिना सुरू आहे.दिवस, नुकताच होळी,धुलीवंदनाचा सण साजरा झाला. काही दिवसावर गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सण येऊन ठेपला आहे. पूर्ण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूर्णा नदीवरील कोल्हापूर बंधारातील पाणीसाठा संपल्यामुळे आठ ते दहा दिवस निर्झनी निर्माण झाली होती दरम्यान जर्मन पालिका प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न करून सिद्धेश्वर धरणातून पाणी उपलब्ध करून घेतले ते पाणी पाच ते सहा तारखेला नदीपात्रात जमा झाले. त्यावेळेस पाणी वेळेला अशी अपेक्षा होती शहरातील काही भागात पाणीपुरवठाही करण्यात आला परंतु दोन दिवसांनी लगेच पालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल वरील विद्युत मोटारी जळाल्यामुळे पुन्हा एकदा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला मोटार दुरुस्ती करिता जवळपास पाच ते सहा दिवसाचा कालावधी लागला. मोटर दुरुस्त होऊन आल्यानंतर बसवून चालू केली असता पुन्हा एकदा मोटर जळाली. अलीकडे पाणीपुरवठ्याच्या जातींवर. त्यातील एक मोटर ही इमर्जन्सी काळासाठी सज्ज असते परंतु मागील काही महिन्यापासून येथील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता किरण गुट्टे यांच्या भोंगळ गर्भरामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही पाणी सोडण्याचे नियोजन नाही पाणी नदीपात्रातील बंधाऱ्यात घेण्यासंबंधीत नियोजन नसल्याने नागरिकांना नाहकच ऐन सणासुदीच्या काळात निर्जळीला सामोरे जावे लागत आहे.
दुरुस्ती केलेली मोटर जळतीच कशी
पालिकेने जॅकवेलवर शेकडो एचपीच्या भल्या मोठ्या मोटारी घेतलेले आहेत. त्या मोटारी जळाल्यानंतर पालिकेत त्यांचे दुरुस्ती करून घेते त्यासाठी लाखो रुपये ही खर्च केले जाते येतील पाणीपुरवठा विभागाच्या वतीने मस्तीच्या नावाखाली लाखो रुपयाची बिले उचलतात आहे मात्र पैसा खर्च करूनही म्हणावे तसे काम होत नसल्याने केलेल्या खर्चावर आणि कामावर साशंकता निर्माण होते आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभाराची खातेनिहय चौकशी करून कार्यवाही करावी अशी वागणे जनतेतून होत आहे.
_______________________________________
नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता किरण गुट्टे व मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे उंटावरून शेळ्या हाकलून नगरपालिका प्रशासनाचा कारोबार सांभाळत आहेत.पालिकेने पाणीपुरवठा विभागात नियुक्त केलेले कर्मचारी हे सफाई विभागांतील कर्मचारी असल्यामुळे त्यांना कुठलाही पाणीपुरवठा विभागांचा अनुभव नाही. सर्व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पाणीपुरवठा विभागाचे अभियंता किरण गुट्टे थातूरमातूर कामे करून लाखोंची कागदपत्री बिले उचलुन कृत्रिम पाणीटंचाईच्या नावाखाली भ्रष्टाचारामध्ये गुंग झाले आहेत.यामुळे पूर्णा करांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे .या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी
राज नारायणकर (सामाजिक कार्यकर्ते पूर्णा)