महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान ; 4जून ला मतमोजणी
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान ; 4जून ला मतमोजणी
नवी दिल्ली — देशातील लोकसभा निवडणुकांचा आज शंखनाद करण्यात आला. एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली.आम्ही निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे. निवडणुकीत 97 कोटी मतदार मतदान करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात एकूण 10.5 लाख मतदान केंद्र असतील तर 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे.यासाठी देशात दीड कोटी निवडणूक अधिकारी काम करणार आहेत. 16 जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान
पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा – 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा -7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा – 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा – 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला,तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7मे रोजी होणार आहे.चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार आहे.पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे.सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी होणार आहे.सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे.4 जूनला मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की 1.82 कोटी तरुण मतदार मताधिकाराचा करणार आहेत. 18 ते 29 वयोगटातील 21.5 लाख मतदार आहेत