पूर्णा पोलिस ठाण्याला हव्यात नवीन गाड्या
मोडकळीस आलेल्या वाहनांवर सुरू आहे पोलीसांचा कारभार;जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा
पूर्णा(प्रतिनिधी)
येथील पाेलिस ठाण्यातील दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी दैननीय अवस्था झाल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गस्त व इतर कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.याचा हद्दीतील पोलीस गस्तीवर परिणाम होतो आहे.त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पूर्णा पोलीसठाण्याच्या दिमतीला नव्या वाहनांचा ताफा देण्याची गरज निर्माण झाली आहे.
पूर्णा शहर हे पोलिस खात्याच्या नकाशावर संवेदनशील शहर म्हणून डकवले गेलेले आहे . येथिल पाेलिस ठाण्याच्या अंतर्गत एकुण ६१ कर्मचारी तसेच ७ अधीकारी असा लवाजमा असुन, हद्दीत झिरोफाटा, एरंडेश्वर ,कात्नेश्वर, आहेरवाडी, माटेगांव, खुजडा या मोठ्या गावांसह जवळपास ३० गावे आहेत. शहरासह ग्रामीण भागात मिळून ५ (बीट) विभाग येताततसेच शहरातुन चुडावा, ताडकळस, झिरोफाटा कडे जाणारे राज्य महामार्ग तसेच तालुक्यातून जाणारा निर्माण धीन समृद्धी महामार्ग होत आहे. येथे कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या हाताळणे, अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी बंदोबस्त राखणे आणि पोलिसांचे सामान्य कामकाज या सगळ्यांसाठी खात्रीशीर वाहनांची गरज नेहमीच भासते.पूर्णा पोलिस ठाण्यात ११२ सेवेसाठी २ दुचाकी,तर २ मोबाईल जीप दिलेल्या आहेत.पहीलेच पोलीसांना वाहन कमी पडत आहेत.जी वाहने आहेत ती देखील मोडकळीस आलेली आहेत.ही वाहनं केव्हाही व कधीही बंद पडते. त्यामुळे पोलिसांच्या कामात व्यत्यय निर्माण होतो. महत्त्वाच्या कामाला या वाहनांचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे येथील सेवकांना खासगी वाहनांचा उपयोग करावा लागतो.येथिल प्रथम मोबाईल जीप थोडीफार वगळता उर्वरित वाहन मोडकळीस आल्याचे दिसून येते.
वाहन साथ देत नसल्याने पोलीस घटनास्थळी वेळेत पोहचु शकत नसल्याने त्याचा फायदा चोरटे व अवैध गौण खनिज माफीया घेत आहेत. आठ दिवसांपूर्वी शहरातील निर्माधीन उड्डाणपुलाखालील रस्त्यावर गस्तीवर असलेल्या पोलीसांचे वाहन अचानक बंद पडले,दुरुस्ती करीता या वाहनास पाच ते सहा तासांचा वेळ लागला.खाजगी मेकानिक बोलावून वाहन दुरुस्ती करावी लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.दरम्यान सुदैवाने कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही म्हणून फावले.अन्यथा मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते असते.त्यामुळे येथिल पोलीसांना जिल्हा पोलीस दलातुन नुतन वाहनं कधी उपलब्ध होणार याकडे लक्ष लागले आहे.
पोलिस अधीक्षक लक्ष देणार का..?
धावत्या व डिजिटल युगात अशा पद्धतीचे वाहन असल्यास पोलिसांच्या हाती गुन्हेगार कसे लागतील, असा प्रश्न पडतो आहे. त्यामुळे जिल्हा पाेलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी याबाबत विचार करून तातडीने पाेलिस ठाण्याला नवीन वाहन उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे.
अपघाताची भीती..!
पाेलिस ठाण्यातील सेवकांना सर्वच कामांसाठी हे खटारा वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे या वाहनाचे सर्वच भाग खिळखिळे झाल्याचे दिसून येते. कामाच्या वेळी हे वाहन कुठेही बंद पडत असल्याने सेवक हे वाहन चालवण्याकडे काणाडोळा करतात. मात्र, गरजेच्या वेळी सेवकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावेच लागते. या वाहनाचा अपघात होऊन जीवितहानी होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.