परभणी;हिंसाचाराच्या घटनेनंतर परीस्थिती नियंत्रणात

Spread the love

आयजी.शहाजी उमप जिल्हात तळ ठोकून;जिल्हाभरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात

परभणी(प्रतिनिधी)
परभणी शहरातील संविधान पुस्तीकेच्या शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला बुधवारी ११ रोजी हिंसक वळण लागले होते. आंदोलकांच्या मोठा जमावाने,वाहनांची तोडफोड दगडफेक,जाळपोळ, करण्यात आली होती.पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करत जमावबंदीलागु केली होती.तर काही काळ इंटरनेट सेवाही बंद केली होती.या तणावपूर्ण घटनांनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. परभणीत पोलिस महानिरीक्षक शहाजी उमप तळ ठोकून आहेत.कोणताही अनुचीज प्रकार घडू नये यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भरांमध्ये चोख पोलीसांनी चोख बंदोबस्त तैनात केला असून बुधवारी रात्री उशिरापर्यंत धुडगूस घालणाऱ्या ४० ते ५० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शहरातील परिस्थती आता नियंत्रणात असल्याचे दिसून येते आहे.
परभणी शहरात बुधवारी झालेल्या आंदोलना वेळी अनेक ठिकाणी तोडफोड झाली. वाहनांचे टायर जाळले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेकी केली गेली. या घटनेमुळे पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. याप्रकरणी, घटनेसाठी जबाबदार असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आले असल्याची माहिती परभणी पोलिसांनी दिली आहे.शहरात सध्या जमाबंदी आहे. मात्र, कोणतीही संचारबंदी नाही, SRPFच्या तुकड्यांना शहरात बोलावण्यात आली आहे, दरम्यान मोठ्या प्रमाणावर शहरातील व्यापाऱ्यांचे नुकसान झालेलं आहे.या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या दंगलखोरांनी शहरात धुडघूस घालून २० ते २५ मोटरसायकलीचे ३ ते ४ चारचाकी वाहनांचे नुकसान केले त्यांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.आ परभणी शहरासह जिल्हाभरात शांतता पसरली असून कुणीही कायदा हातात घेऊ नये, अस आवाहन स्वतःआयजी शहाजी उमप यांनी केले आहे. तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनीही परभणीकरांना शांततेचा आवाहन केले. दंगली दरम्यान शहरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

You cannot copy content of this page