शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनापुढे जायकवाडी पाटबंधारे प्रशासन नमले;११०० क्युसेसने पाणी सोडणार

Spread the love

जायकवाडी प्रशासनाचा निर्णय

परभणी(प्रतिनिधी)

जायकवाडी जलाशयातून परभणी जिल्ह्यातील कालव्याद्वारे टेल पर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे या मागणीसाठी शिवसेनेच्या उबाठा गटाच्या वतीने जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत कार्यालयाला सोमवारी १७ रोजी टाळे ठोकले. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यापुढे जायकवाडी पाटबंधारे प्रशासन नरमले असुन, कालव्याच्या माध्यमातून ११०० क्युसेस पाणी सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

     जायकवाडीतून परभणी जिल्ह्यासाठी पाणी सोडण्याची मागणी करत सोमवारी शिवसेना उबाठाच्या गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे खा.संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.त्यानुसार संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ या कार्यालयाला आज  कुलूप ठोकले. शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पाटबंधारे विभागाचे संभाजी नगरचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी सोमवारपर्यंत ११०० क्युसेसने पाणी सोडण्याचे आश्वासन दिले.सुमारे  दोन तासानंतर हे आंदालन स्थगित करण्यात आले.  या आंदोलनात सभापती पंढरीनाथ घुले, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, भगवानराव धस, काशिनाथ काळबांडे, दिलीपराव आवचार, रामप्रसाद रणेर, शुभम पाष्टे, अतुल सरोदे, विलास आवकाळे, माणिकराव भालेराव, सुभाष आहेर, विठ्ठल पंढरे, हनुमान कदम, विशाल भोसले, गजानन शिराळे, गजानन कुबडे, गोविंद पहेलवान, वशिष्ट मिसाळ, सुरेश काळबांडे, माणिकराव आव्हाड, दामोधर खुळे, अशोक वाघ, प्रल्हादराव लाड, कृष्णा गोरे, अविनाश कांबळे, सचिन राष्ट्रकुट,बाळासाहेब वैरागर, धनंजय देशमुख, विक्रम मोरे, देविदास खटींग, मोतीराम खटींग, मुंजाजी गिराम, पांडूरंग खिल्लारे, रावसाहेब रेंगे, जनार्धन सोनवणे, लिंबाजी शिंदे, सुभाषराव दळवी, गणपत दळवी, विष्णू बेले आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page