Parbhani;गॅस सिलेंडरच्या स्फोटाने परभणी हादरली..

Spread the love

वसमत रोडवर वडापावच्या गाड्यावर दोन सिलेंडर(gas cylinder blast)फुटले; सुदैवाने हानी नाही

परभणी(प्रतिनिधी)
गॅस सिलेंडरच्या स्फोटाने परभणी हादरली असुन वसमत रोडवर(Basmat road)एका वडापावच्या गाड्यावर दोन सिलेंडर फुटुन काळजात धडकी भरवणारा स्फोट झाल्याची घटना शनिवारी ११ जानेवारी रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही.अग्नीशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.मात्र उघड्यावर बेजबाबदापणे कोणतीही सुरक्षितता न बाळगता गॅस सिलेंडर वापरण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.आता तरी पुरवठा विभाग याकडे(district supply office)लक्ष देणार आहे की नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे.
परभणी शहरातील अती वर्दळ असलेल्या वसमत रोडवरील शिवशक्ती अपार्टमेंट समोर तुलसी या उपहारगृहासमोरील एक प्रसिद्ध मातोश्री वडापाव सेंटरचा स्टाँल आहे . शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास येथिल दोन गॅस सिलेंडरचा एका पाठोपाठ दोन मोठे स्फोट झाला आहे.या स्टाँल चालकाने नेहमीप्रमाणे आपले व्यवहार आटोपून रात्र घर गाठले, परंतु रात्री सव्वा बाराच्या सुमारास या स्टॉल मधील एका सिलेंडरचा अचानक मोठा स्फोट झाला. तो ऐवढा कि त्या स्फोटाचा आवाज लांबपर्यंत ऐकू आला. या स्फोटाने आगीचे लोळ उठले.अख्खा वसमत रस्त्यावर लांबपर्यंत हे आगीचे लोळ दिसत होते.या रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली,आग ओळखून अग्निशामक दलास ती बाब कळवली.परंतु आगीचे बंब येण्यापूर्वीच त्या स्टॉल मधील दुसऱ्या सिलेंडरचा त्या पाठोपाठ पाचव्या मिनिटांनीच पुन्हा मोठा स्फोट झाला. त्यामुळेही वसमत रस्ता या आवाजाने दणाणलाच, सुदैवाने या स्टॉलवर,परिसरात कोणतीही व्यक्ती उभी नव्हती, या आगीत स्टॉल पूर्णतः जळून खाक झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग पूर्णतः आटोक्यात आणली, दरम्यान स्टॉल वरील कढईतील गरम तेल सिलेंडरवर पडल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बेजबाबदार पणे गॅस वापरावर कारवाई अपेक्षित…
शहरासह जिल्ह्यात अवैध पुणे सुरक्षितता न बाळगता घरगुती,व्यवसायीक मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा वापर सुरू आहे.याकडे संबंधित गॅस एजन्सी धारकासह येथिल पुरवठा विभागाच्या अधीका-यांचे साफ दुर्लक्ष होत आहे.कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना न करता व्यापारी गॅस भर रस्त्यावर दुकाने थाटून नागरिकांच्या जिवाशी खेळ करत आहेत.परभणी रस्त्यावर घटलेली घटना मध्यरात्री घडली.यावेळी वर्दळ नसल्याने घटनेत मोठा अनर्थ टळला मात्र दिवसाढवळ्या घटना घडल्यास मोठा विध्वंस झाला असता आता तरी प्रशासनाने अश्या संभाव्य घडणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

You cannot copy content of this page