सरपंच संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही-मनोज जरांगे पाटील
परभणीत सर्वपक्षीय मोर्चा; देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मनोज जरांगे पाटील यांची विशेष उपस्थिती;आरोपींना तातडीने अटक करून फासावर लटकवा एकमुखी मागणी; रस्त्यावर उसळला जनसागर
परभणी(प्रतिनिधी)
Parbhani Morcha;’मी असलं राजकीय कधी बोलत नाही. पण जेव्हा अस्मितेचा विषय येतो, जर माणसांचे मुडदे पडायला लागले तर हे सहन होत नाही. आमची लेकरं उघडे पाडायला लागलात तर, आमची लोकं मारुन जर तुम्ही आरोपी घरात लपवून ठेवता, हे संतापजनक आहे.’ तर ‘आरोपींना पुण्यात नेमकं सांभांळलं कोणी? सगळे आरोपी पुण्यात सापडायला लागले आहेत. याचा अर्थ तुमच्या सरकारमधील मंत्री आरोपींना सांभाळयला लागले आहेत. हत्या आणि खंडणी आरोपींची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांनाच सहआरोपी केले पाहिजे,’मी आतापर्यंत कोणाचंही नाव घेऊन बोललो नाही. कुणकुण लागल्याशिवाय मी बोलत नाही. पण संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना धक्का जरी लागला, तरी मी धनंजय मुंडेला सोडणार नाही. देशमुखांना त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरु देणार नसल्याचे मनोज जरांगेंनी बोलताना सांगितले .
बिड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) फरार आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी परभणी(Parbhani)येथे सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. जिंतूर रोडवरील नूतन शाळेपासून निघालेला हा मोर्चा सुभाष रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क,स्टेशन रोड,नारायण चाळ मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आला. ठिकाणी झालेल्या जाहीर सभे प्रसंगी मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मनोज जरांगे(Manoj Jarange), आमदार सुरेश धस(MLA Suresh Dhas),खासदार संजय जाधव,(MP Sanjay Jadhav) आ.डॉ. राहुल पाटील,(MLA (DR.Rahul Patil)आ. राजेश विटेकर,(MLA Rajesh Vitekar) आ.संदीप क्षीरसागर,(MLA Sandip Shirsagar) , माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर,,(ex minister Suresh warpudkar)मा.आ.विजय भांबळे(vijay bhamble) नरेंद्र पाटील(Narendra Patil), ज्योती मेटे(Jyoti Patil), शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम (Vishal kadam)वैभवी देशमुख(Vaibhav Deshmukh)यांनी मनोगत व्यक्त करताना संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोपी आजही मोकाट फिरत आहेत. या संपूर्ण प्रकारात अनेक दिवस राज्यातच सोयीने फिरत असलेला आणि नाट्यमयरित्या शरण आलेल्या वाल्मीक कराड(Walmik Karad)याच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज असताना त्याला पोलीस कोठडीतही मदत केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय यांना पोलीस ठाण्यातच काही मंडळींकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे यापुढील काळात असे प्रकार घडले घडल्यास मंत्री धनंजय मुंडे(Minister Dhanjay Mundhe)यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
आरोपींना मोक्का लावा -आ.सुरेश धस
परळी आणि बीडमधील(Beed) गुंडगिरी मोडीत काढण्याची गरज असून त्या दृष्टीने राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी ही या मोर्चाद्वारे करण्यात आली. आमदार धस यांनी या घटनेचा संपूर्ण आढावा घेत वाल्मीक कराड हा खुलेआमपणे आजवर गुणी गुन्हेगारी करत आलेला आहे. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे त्याचबरोबर या प्रकरणातील खंडणी आणि सरपंच देशमुख यांच्या हत्येमध्ये सखोल चौकशी करून त्याला मोक्का लावला पाहिजे, अशी मागणी करताना त्याच्या मागील सूत्रधार म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.आ. धस यांनी बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याच्या घोटाळ्यावरही प्रकाश टाकला.
आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी–खा.जाधव
खासदार जाधव यांनीही सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून फासावर लटकवा,परळीतील अवैध धंद्यांवर विशेषतः थर्मलची राख, गोदावरी काठावरील वाळूची तस्करी आदी बाबींवर प्रकाश टाकताना यावेळी बोलताना त्यांनी परळीचे लोण गंगाखेडपर्यंत पोहोचले असले तरी त्याचा बिमोड करण्यासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.