अखिल भारतीय छावा संघटनेचे मावळे बंड उभारून मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही -साईराजे देशमुख
अखिल भारतीय छावा संघटनेचे मावळे बंड उभारून मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही -साईराजे देशमुख
परळी/प्रतिनिधी
मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी जो सुप्रीम कोर्टाने निकाल मराठा समाजासाठीच नव्हे, तर सबंध भारतभरातील सर्व जाती- धर्माच्या आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा निकाल आहे. आज संपूर्ण जगात कोरानासारख्या जागतिक महामारीने थैमान घातलेले आहे. संपूर्ण देश या आजाराशी लढा देण्यासाठी प्राणपणाला लावत आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. देशात भाजपाशासित न्यायव्यवस्थेचा हा परिपाक असून पुन्हा एकदा मराठ्यांचा घात करण्याचा डाव साधला गेला, असे शरसंधान केंद्रातील
भाजपा सरकारवर करतानाच अ. भा. छावा संघटनेचे मावळे बंड उभारून मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही होऊ देणार नाही, असा निर्धार अ.भा.छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष यांनी केले राज्यातील महाआघाडी सरकारही मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळोवेळ गाफील राहिले
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला जागे करण्यासाठी अ. भा. छावा संघटनेने वेगवेगळी तीव्र आंदोलने करुन सरकारला न्यायालयीन लढाईमध्ये सामील होण्यास भाग पाडले होते. परंतु आजचा कोर्टाचा निकाल पाहता राज्य सरकार नाकर्त्याच्या भूमिकेतच राहिलेले दिसते,
असेच म्हणावे लागेल. संपूर्ण निकालानंतर छावा संघटनेच्या राज्य जगात ज्याप्रकारे कोरोनाचा कहर वाढत
प्रखरपणे रस्त्यावर समाज दिसत नसला तरी प्रत्येक घराघरात या निर्णयाविरोधात तीव्र संतोष व उद्रेकाची भावना पसरत आहे, ही भावना सरकार थांबवू शकणार नाही,व येणाऱ्या काळात तिव्र जन आदोलन उभा करू असा गर्भित इशाराही यांनी दिला.