पूर्णा तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा;शार्टसर्किटमुळे कडब्याच्या गंजीसह शेत आखाडा पेटला
फळबागांसह झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा-शिवसेना विशाल कदम
पूर्णा/प्रतिनिधी
तालुक्याला सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला असून, महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्यांत घर्षण होऊन लागलेल्या आगीत नावकी येथे एका शेतकऱ्याची दीड हजार कडब्याची गंजी तसेच खुजडा एका शेतकऱ्याचा शेत आखाडा जळाला आहे.
पूर्णा तालुक्यात सर्वत्र सोमवारी ता.५ रोजी सायं ५;३० चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला.अनेक गावांतील घरावरील पत्रे उडून गेली असुन,अनेक गावांमध्ये रस्त्यांच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडली आहेत.तर यापैकी काही झाले विद्युत वाहिन्यांवर पडल्याने तालुक्यातील बहुतांश ठिकाणी विज पुरवठा खंडित झाला होता.झिरोफाटा पुर्णा रस्त्यावर नावकी शिवारात शेतकरी पवन रंगनाथ भुसारे यांची ५ वाजण्याच्या सुमारास गट नं११७ येथिल शेतातून गेलेल्या विद्युत वाहिन्यांत घर्षण होऊन लागलेल्या आगीत वाहीन्यांजवळील रचुन ठेवलेली सुमारे दिड हजार कडब्याची गंजी जळून सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.आगीची घटना घडल्याचे समजताच शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम व पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन भेट देउन पाहणी केली.तर खुजडा शिवारात एका शेतकऱ्याचा शेत आखाडा देखील विद्युत वाहिन्यांत घर्षण होऊन लागलेल्या आगीत पेटल्याचे वृत्त आहे मात्र हा आखाडा नेमका कोणाचा तसेच कीती नुकसान झाले हे मात्र नक्की समजू शकले नाही.पूर्णा पालीकेच्या अग्नीशामक दलाच्या अमजद कुरेशी, दिपक गवळी, सोनाजी खिल्लारे आदींनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली.अचानक आलेल्या चक्रीवादळ चक्रीवादळ वादळामुळे संत्रा,चिकु,अंबा, केळी आदीं फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.प्रशासनाने बांधावर जाऊन फळबाग नुकसानीचे पंचनामे करावेत असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी केले आहे.