प्रहारचे उपोषण; पूर्णा तालुक्यातील शेत रस्ते खुले करा-शिवहार सोनटक्के
पूर्णा(प्रतिनिधी):
तालूक्यातील अनेक गावशिवारामध्ये तसेच दस्तापूर शिवारातील दोन ठिकाणी अडवण्यात आलेले शेतरस्ते तात्काळ खुले करुन देण्यात यावे अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांनी प्रशासनाने केली आहे.या मागणीसाठी पूर्णा तहसिल कार्यालया समोर त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसह अमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
पूर्णा तालूक्यातील अनेक गावांमध्ये तसेच दस्तापूर येथील काही शेतकऱ्यांची गट क्रमांक ५६,५७,५८,६०,६२ मध्य जमीन आहे.त्या जमीनीत जाण्यासाठी गट क्रमांक ५२,६१ मधून वडिलोपार्जित शेतरस्ता असून तशी महसूल दप्तरी नोंद आहे.तसेच तो रस्ता अस्तित्वात आहे.परंतू,खोडसाळपणे पुरभाजी बापूराव गोरे,निवृत्ती गोरे, निवृत्ती गोरे यांनी रस्ता आडवला आहे.त्यामुळे शेतात बैलगाडी औत घेवून शेती कामे करण्यासाठी जाता येत नाही.रस्ता अडवण्याचा कोणताही अधिकार नसताना तो अडवून धरला आहे.त्याच बरोबर येथीलच दस्तापूर शिवार गट क्रमांक ४०,४१,४२,४३,४४ मध्य काही शेतकऱ्यांची जमीन असून सदर गटातील शेतात जाण्यासाठी गट क्रमांक ४५ मधून रस्ता आहे .शासकीय नोंद असलेला वडिलोपार्जित व सध्या अस्तित्वात असणारा रस्ता तेथील सय्यद गफार, सय्यद शब्बीर यांनी अडवला आहे.त्यामुळे हे अडवलेले दोन्ही शेतरस्ते तात्काळ खुले करुन देण्यासाठी सबंधीत शेतकरी मधूकर गाडेकर, उत्तम गाडेकर,माधव गाडेकर, गुणाजी गायकवाड, विष्णू शिनगारे,श्रिहरी गायकवाड, गणेश गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर,सिकंदर पठाण,कैसरखा पठाण,रशिद खा पठाण, सुरेश गोरे,रामा कसबे,आबा गायकवाड यासह प्रहारचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने,तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के,विष्णू बोकारे, विठ्ठल जोगदंड हे अमरण उपोषणाला बसले आहेत.जो पर्यंत रस्ता खुला करुन दिला जात नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार असल्याचे शिवहार सोनटक्के यांनी सांगितले.