औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पूर्णेत बजरंग दलाचे निवेदन
तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
पूर्णा(प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणीकरत पुर्णेतील विहींपी, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी १७ मार्च रोजी तहसीलदारांना निवेदन देत त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, उझबेगी परकीय आक्रमक बाबर यांचे वंशज औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच, शिख गुरु तेगबहाद्दुर यांची क्रूर हत्या केली. त्यांच्या दोन बालकांना ते मुस्लीम झाले नाही म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणी चिमून मारण्यात आले.श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले. मथुरेच्या मंदिराचा विध्वंश केला. सोरटी सोमनाथाचे मंदीर फोडले. त्र्यंबकेश्वर, जेजुरी गड यावर हल्ले केले. हजारो क्रूर कतल केली. हिंदूचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले. अश्या क्रूरकर्मा व आततायी औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर भारत देशात नसावी, ही कबर पूर्णपणे नष्ट करावी, असे निवेदन मुख्यमंत्र्यांना पूर्णेतील विहींपी, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पूर्णा तहसीलदारां मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आले. निवेदनावर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी रमण ओझा, एकनाथराव काळबांडे, निलेश आगलावे, अभिजीत चिटणीस मुंजा पातळे,, राज उर्फ गोविंद ठाकर, , अनिल चाफा कानडे, करण लोखंडे ,माधव लोखंडे, भरती नाथ शहाणे, गोविंद सोळंके, पांडुरंग रौंदळे, श्याम सिंग परदेसी, लखन लालवानी, ओम बंडू आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.