१२ महीन्यांपासुन बंद असलेल्या एटीएमचा फायदा नक्की कुणाला.!
पूर्णेतील महाराष्ट्र बँकेचे एटीएम सुरू होणार तरी कधी..!
शाखा व्यवस्थापकाच्या कासवछाप कारभाराचा फटका;ग्राहक वैतागले
पूर्णा(प्रतिनिधी)
येथील महाराष्ट्र बॅंकेची एटीएम सुविधा मागील १२ महीन्यापासुन बंद पडल्याने बँकेच्या ग्राहकांना ईतर बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.वेळोवेळी तक्रार करुनही शाखा व्यवस्थापक कच्छवे याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या कासवछाप कारभाराला ग्राहक अक्षरशः वैतागले आहेत.बंद असलेल्या एटीएमचा फायदा नक्की कुणाला होते आहे याचा शोध बँकेच्या वरीष्ठ अधीका-यांनी घेऊन ग्राहकांची गैरसोय थांबवावी अशी मागणी पुढे येत आहे.
पूर्णा तालुक्यात महाराष्ट्र बॅंकेची एकमेव शाखा आहे.या शाखेत रेल्वे कर्मचारी,अन्य शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच व्यापारी,शेतकरी आदींसह हजारोंच्या संख्येने ग्राहक आहेत.शहरात शाखेच्या जवळच शाखेची एटीएम सुविधा गतवर्षी पर्यंत अस्तित्वात होती.मात्र येथिल शाखा व्यवस्थापकाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे ही सुविधा बंद पडली.त्याचा फटका नविन सेवा सुरू करणा-या ग्राहकांना बसत आहे.नविन कार्ड अपडेट करण्यासाठी जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागते आहे.तसेचएटीएम सुविधा वापरकर्त्यांना ज्या शाखेचे एटीएम कार्ड आहे त्यांना काही व्यवहार मोफत आहेत.तर दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी काही व्यवहारानंतर चार्ज द्यावा लागतो आहे.हा नाहक भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागत आहे.येथिल एटीएमची सुविधा बंद झाल्याने कार्यालयीन वेळेत बँकेत दैनंदिन व्यवहार करण्यासाठी मोठी गर्दी देखील होत आहे.त्यामुळे ग्राहकांना तासंन तास ताटकळत उभे रहावे लागते आहे.दुसरीकडे
महाराष्ट्र बँक प्रशासनाने दत्तक घेतलेल्या तालुक्यातील वाई लासीना गावांसाठी नियुक्त केलेला बँकींग करस्पाँडींग एजंड अर्थात बँक मित्राने पूर्णा शाखेत आपलं बस्तान मांडले आहे.त्यास ईथे बसण्याची परवानगी बँकेत बसण्याची मुभा कोणी व कशासाठी दिली..?त्यासाठी त्याने कोणाकडे वशिला लावला.? त्यास मिळणाऱ्या कमीशन मध्ये कोण वाटेकरी आहे का.? असा सवाल उपस्थित होतो आहे.बॅक नियमानुसार बँकींग करस्पाँडींग एजंड( बँक मित्र) नियुक्त केलेल्या गावात राहून ग्राहकांना सेवा देणे बंधनकारक आहे. मात्र एकीकडे बँकेचे एटीएम सुविधा बंद झाल्याने कॅश काऊंटर वर गर्दी वाढत आहे.यागर्दीस कंटाळून अनेक ग्राहक या बँक मित्राकडून नाईलाजाने दिवसभरात लाखों रुपयांचे व्यवहार करत आहेत.त्याला या व्यवहारात दैनंदिन हजारो रुपयांचा फायदा होतो आहे.बॅकेत गर्दी होऊन मर्जीतील एजंटचा फायदा व्हावा यासाठीच तर शहरातील शाखेची एटीएम सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद तर केली नाही ना.? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
बॅकेचे नियोजन फेटाळले वरीष्ठ कधी लक्ष देणार..
पूर्णा येथिल महाराष्ट्र बँक शाखा येथिल अनागोंदी कारभारामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. बँकेत दलालांचा विळखा,एजंटांचा गराडा, सुरक्षेचा अभाव, कित्येक महिन्यांपासून एटीएम सुविधा बंद, चोरट्यांकडून ग्राहकांची लूट, मर्जीतील ग्राहकांना नियम धाब्यावर बसवून सेवा असे अनेक प्रकार घडल्याचे उघडकीस येत आहेत.त्याची जोरदार चर्चा शहरात होते आहे.स्थानिक प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे शाखेची प्रतिमा मलीन होत असल्याने बँकेच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.