Purna Newsप्रस्तावीत चुडावा-मरसुळ बायपास प्रकरणी पूर्णेकरांचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकरांना साकडं
परभणीत शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्र्यांची भेट; पूर्णेकरांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन
पूर्णा ता.२ प्रतिनिधी;(Purna Railway News) प्रस्तावित मरसूळ-चुडावा रेल्वे बायपास प्रकल्पाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे.पूर्णा शहरातील सर्व पक्षीय बैठकी नंतर आता बायपास विरोधी कृती समितीच्या एका शिष्टमंडळाने परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांची भेट घेऊन याप्रकरणात लक्ष घालून पुर्णा रेल्वे जंक्शनचे महत्व कमी करणा-या रेल्वेचा हा प्रस्ताव स्थगित करण्यात यावा यासाठी साकडं घातलं आहे.पालकमंत्री बोर्डीकर यांनीही शिष्टमंडळास “पूर्णावासीयांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
रेल्वे प्रशासनाने अकोला-पूर्णा-नांदेड लोहमार्गाला जोडण्यासाठी मरसुळ रेल्वे स्थानक ते चुडावा रेल्वे स्थानक असा बायपास प्रस्तावित केला आहे.हा बायपास शहराला वळसा घालून केला जाणार असल्याने शेकडो हेक्टर वरील शेतकरी भुमीहीन होणार आहेत तच परंतु इंग्रजांनी स्थानिक केलेले ऐतिहासिक रेल्वे जंक्शन हे कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.तसेच याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवर देखील होणार आहे.एकीकडे या बायपाला पुर्णेकर जोरदार विरोध करत आहेत. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासन याला ‘महत्वकांक्षी प्रकल्प’ म्हणत असले तरी, या प्रकल्पामुळे निश्चितच पूर्णा रेल्वे जंक्शनचे अस्तित्व आणि महत्त्व धोक्यात येणार असल्याची तीव्र भीती नागरिक आणि बाधित शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी बायपास विरोधी कृती समितीच्या वतीने शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता.१)रोजी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांची भेट घेऊन पुरवणे करांचे हित लक्षात घेऊन प्रस्तावित बायपास रद्द करावा अशी मागणी केली आहे.

शिष्टमंडळाच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री बोर्डीकर यांनी या प्रकरणात पूर्णपणे लक्ष घालून पूर्णावासीयांवर होणारा अन्याय दूर करण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात भाजपचे लक्ष्मीकांत कदम, डॉ. अजय ठाकूर, प्रदीप नन्नवरे, अंकुश बोकारे, आणि विठ्ठल भोरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता. पालकमंत्र्यांच्या आश्वासनामुळे या आंदोलनाला आता मोठे राजकीय बळ मिळाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या भूमिके विरोधात आता थेट पालकमंत्रीच मैदानात उतरण्याचे संकेत मिळाल्याने पूर्णा वासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता रेल्वे प्रशासन यावर काय भूमिका घेते पालकमंत्री हा प्रश्न कसा हाताळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












