वंचित बहुजन आघाडीचा बुधवारी पालीकेवर जन आक्रोश मोर्चा
पूर्णा ता.३(प्रतिनिधी)
पूर्णा पालीकेने केलेल्या करवाढ विरोधात विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी ४ जुनं रोजी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे सुनिल मगरे, तुषार गायकवाड यांनी दिली आहे.हा मोर्चा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथून सकाळी ११ वा.पूर्णा पालेकवर आगेकूच करणार आहे.या मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थिती रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीने नुकतेच पालीकेला निवेदन देत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.या मोर्चास प्रमुख उपस्थितीत वंचितचे राज्य नेते , फारुख अहमद तसेच अँड अविनाश भोसिकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून दिलीप दादा हनुमंते, तुकाराम ढगे,तुकाराम भारती,.सौ सुनिता ताई साळवे, युवानेते राजू नारायणकर, शामराव जोगदंड,गणेश गाडे ,शिदोधन सावंत दिलीप मोरे, शामसुंदर काळे.रवी वाघमारे, आवडाजी ढवळे,आकाश गायकवाड,लक्ष्मीकांत शिंदे,सौ.अर्चना पंडित,नागेश एंगडे,लक्ष्मण गायकवाड, केशव जोंधळे,सौ मंजुषा पाटील, अॅड भोजाजी बनसोडे, उमेश बा-हाटे,राधिका गोधने, सुनिल गवळी, सी आर कुरवाडे लिंगीकर, अॅड सिद्धांत व्हि गायकवाड माधव भगत, अॅड. हिरानंद गायकवाड, गोविंद भेणे, सय्यद मसरत सय्यद जाणी, सौ वर्षा ताई दुधमल, सिताराम रेनगडे, मुज्जमिल खाँ चाँद खाँ आदींची उपस्थिती राहणार आहे. नगर परिषदेने केलेली कर वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी.महात्मा बसवेश्वर महाराज तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे,यांचा पुतळा उभारण्यात यावा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुशोभीकरण करावे.आदीं एकुण १७ मागण्या केल्या मांडल्या आहेत.मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थिती रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केले आहे.