पूर्णा शहरात स्वच्छतेचा बोजवारा;पावसाळ्या पूर्वीची नालेसफाईही रखडली
जागोजागी घाणीचे साम्राज्य;प्रशासकांनी लक्ष घालण्याची मागणी
पूर्णा( प्रतिनिधी)
मान्सूनचे आगमन झाले आहे, पाऊसधारा कोसळत आहेत.शहरात पावसाळ्या पूर्वीची नालेसफाई करण्यात आली नसल्याने जागोजागी थोड्याफार पावसाच्या पाण्याने शहरातील गटाराचे पाणी रस्त्यावर येत आहे.तर अनेक वसाहतीमध्ये साफसफाई होत नसल्याने जागोजागी कच-याचे ढिगारे जमा होऊन अस्वस्थता पसरली आहे.पालीका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
पूर्णा पालीकेवर मागील चार ते साडेचार वर्षापासून प्रशासक कारभार करत आहे.प्रशासकांचे स्वच्छता विभागाकडे दुर्लक्ष झाल्याने शहर व परिसरात जागोजागी कच-याचे ढिग साचले आहेत.त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून,पालीकेच्या सफाई विभागातील घंटागाडी अदृश्य झाल्या आहेत.पावसाळापुर्वी दरवर्षी पालीचा शहरातील नालेसफाई करुन घेते मात्र यंदा पालीकेने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र दिसत आहे.शहरात जागोजागी गटारे तुंबलेल्या अवस्थेत आहेत.थोड्याफार पावसाने शहरातील रस्त्यांवर गल्ली बोळात गटाराचे पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत आहे.पालीका प्रशासक व प्रशासनानी याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
पूर्णा शहरात साफसफाई होत नसल्याने सर्वत्र जागोजागी कच-याचे ढिगारे साचले आहेत.सर्वत्र घाण पसरली आहे.पालीकेने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
–राज नारायणकर सामाजिक कार्यकर्ते पूर्णा