सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी गुरुवारी मराठा समाजाचे आक्रोश आंदोलन
पूर्णा येथील झिरो टिपॉईंट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत निघणार जन आक्रोश मोर्चा; मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सकल मराठा समाजाचे आवाहन
पूर्णा(प्रतिनिधी),
बिड जिल्ह्यातील मस्साजोग ता. केज येथील आदर्श गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी पूर्णा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जन आक्रोश आंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणाला जवळपास १५ दिवस उलटून गेले आहे.देशमुख यांचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत.या मारेकऱ्यांना व देशमुख यांच्या खुनाचा कट रचणा-या मुख्य सूत्रधारास अटक करा या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी (ता.२६) रोजी स.११ वाजता पूर्णा येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जन आक्रोश आंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.हा मोर्चा झिरो टिपॉईंट पासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका पर्यंत काढण्यात येणार आहे. या आंदोलनाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, पूर्णा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.