आवहान-२०२४;विद्यार्थ्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
पूर्णा/प्रतिनिधी
श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील पाच स्वयंसेवक व एक महिला कार्यक्रमाधिकारी यांनी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाचे आयोजन Chancellor’s Brigade महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी प्रशिक्षण आव्हान -2024 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ तील राष्ट्रीय सेवा योजना विभागा यांनी केले .
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कडून एकूण शंभर विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाते. विद्यापीठ अंतर्गत चार जिल्ह्यातून स्वयंसेवकाची ,नांदेड,लातूर, परभणी, हिंगोली या प्रत्येक जिल्ह्यातून २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. त्यामध्ये परभणी जिल्ह्या तून महाविद्यालयातील त्यामध्ये दोन मुले व तीन मुली कू.शुभांगी काकडे, कु.पल्लवी काटकर , कु. स्मिता कुऱ्हे , नितीन आडबाल ,नामदेव सूर्यवंशी व कार्यक्रमाधिकारी डॉ.पुष्पा गंगासागर या पाच स्वयंसेवक व एक महिला कार्यक्रम अधिकारी यांची निवड झाली. त्यांनी अमरावती येथे दहा दिवसीय प्रशिक्षण घेतले. भारतीय संरक्षण दलाचे ट्रेनर यांनी स्वयंसेवकांना प्रशिक्षित केले.
यामध्ये सर्प दंश,प्राणी दंश फिजिकल फिटनेस योगा , फर्स्ट एड,सीआरपी प्रॅक्टिकली,मेघगर्जनेचे वादळ , विजेचा कडकडाट व मुसळधार पाऊस,चक्रीवादळा,गारा पडू शकतात तसेच ढगफुटी यामधून बचावा करिता कोणती पावले उचलायला हवी, करिता प्रशिक्षण देण्यात आले.स्नायू व हाडांची दुखापत यावर व स्नायू वर येणाऱ्या ताण ,सूज याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले पूरग्रस्त भागात मदत कार्य पोहोचविण्याचे कार्यपद्धती समजावून सांगितले.जैविक कीरण व किरणोत्सारी पदार्थ वस्तू या भागा पासून निर्माण होणारे धोके.मानवी जीवनासाठी नैसर्गिक आपत्ती भूकंप ,लँड स्लाईड ,फॉरेस्ट फायर बायोलॉजिकल इमर्जन्सी या प्रकारच्या सर्व विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.
नैसर्गिक आपत्ती वापरण्यात येणाऱ्या साहित्याची ओळख करून देण्यात आली दरी किंवा खाली पडलेल्यांना वाचविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्यक्षात डेमो मध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला .सर्व अधिकारी वर्ग माननीय कुलगुरू यांच्या मार्गदर्शन प्रशिक्षण देत असलेले भारतीय संरक्षण दलाचे सर्व अधिकारी व त्यांचे सहकारी यांनी महाराष्ट्रातील एकूण अकराशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. महाविद्यालयाच्या वतीने उत्तमरावजी कदम ,प्रा. गोविंदराव कदम , प्राचार्य डॉ. के.राजकुमार ,उपप्राचार्य डॉ. शिवसाब कापसे व उपस्थित सर्वांनी अभिनंदन केले.