संदर्भ ग्रंथ वाचनाने ज्ञानात भर पडते… डॉ. मनोहर चपळे

Spread the love

पूर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत विशेष व्याख्यान

पूर्णा(प्रतिनिधी)…
वाचनामुळे विदयार्थ्याच्या व्यक्तिमत्वामध्ये फार मोठा बदल होत असतो ज्ञानाच्या प्रगतीमुळे त्याला चांगला रोजगार मिळू शकतो त्यामुळे तो येणाऱ्या भविष्यातील अडचणीला तो सहज पार करू शकेल..आज विदयार्थी वाचन संस्कृती पासून दूर जात आहे कोणतेही संदर्भ ग्रंथ विदयार्थी वाचन करत नाही त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. मनोहर चपळे यांनी केले आहे.
पूर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय येथील मराठी विभागाच्या वतीने शासन परिपत्रकानुसार वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते प्रमुख वक्ते डॉ. मनोहर चपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ.गजानन कुरुंदकर व डॉ. शिवसांब कापसे,डॉ. जितेंद्र पुल्ले,डॉ. अजय कुऱ्हे, डॉ.बालासाहेब मुसळे,डॉ. संतोष चांडोळे,डॉ. राजीव यशवंते,डॉ.राजू शेख,प्रा. शेख, डॉ.सोमनाथ गुंजकर यांची उपस्थिती होती.डॉ. मनोहर चपळे यांनी विदयार्थ्यांना पुढे मार्गदर्शन करताना म्हटले कि, ज्ञानाच्या या महासागरात जितके ज्ञान घेतले तेवढे कमीच आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल संस्कृतीमध्ये न गुरफटता वाचन संस्कृती जपावी.असेही ते म्हणाले.यावेळी प्राचार्य डॉ. के.राजकुमार यांनी विद्यार्थ्यांनी नव निर्मिती करण्यासाठी वाचन करणे अतिशय महत्त्वाचे आहे ज्ञान आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक संदर्भ ग्रंथ, पुस्तके वाचन केले पाहिजे तरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल. देशाचा विकास व्हायचा असेल तर तेथील तरुण वर्ग हा वाचन संस्कृती सोबत जोडला गेला पाहिजे तरच तो यशाची उंच शिखरे गाठू शकेल असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ओमकार चिंचोले यांनी केले. तर आभार डॉ.विजय पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकत्तेर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page