महाराष्ट्र बँकेचा कारभार ठेपाळला..! कित्येक महिन्यांपासून ए.टी.एम गायब,दलालांचा हस्तक्षेपही वाढला,ग्राहकांची होतेय गैरसोय
पूर्णेतील प्रकार;शाखाधिकाऱ्याचे दुर्लक्ष
पूर्णा/प्रतिनिधी
महाराष्ट्र बँक शाखेच्या शाखाधिका-यांच्या दुर्लक्षीत कारभारामुळे शाखेचा कारभार ठेपाळत चालला असून,शाखेत दलालांचा हस्तक्षेपही मोठ्या प्रमाणात तर वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तर बँकेचे एकमेव ए.टी.एम गेल्या कित्येक महिन्यांपासून गायब झाले आहे.एटीएमची सुविधा बंद झाल्याने शाखेच्या हजारों ग्राहकांची चांगलीच गैरसोय होताना दिसत आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष देण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे
पूर्णा शहर व तालुक्यातील जनतेसाठी अन्य बँका व्यतिरिक्त महाराष्ट्र बॅंकेची एक मेकमेव शाखा महावीर नगर भागात आहे.या शाखेत भौतिक सोयी सुविधा मिळत असल्याने रेल्वे कर्मचारी,अन्य शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच व्यापारी,शेतकरी आदींसह हजारोंच्या संख्येने ग्राहक वाढतच चालले आहेत.त्यामुळे कार्यालयीन वेळेत बँकेत दैनंदिन व्यवहार करण्यासाठी गर्दी होत आहे.त्यामुळे ग्राहकांना तासंन तास ताटकळत उभे रहावे लागते आहे. काही एटीएम धारक नागरिक गैरसोय होऊ नये यासाठी वेळ वाचवण्यासाठी एटीएमचा वापर करत असत मात्र मागील अनेक महीन्यापासुन एटीएम सुविधा बंद झाल्याने ग्राहकांचे वांदे झाले असून खिश्यातील एटीएम कार्ड शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
येथिल महाराष्ट्र बॅंकेकडे ग्राहकांचा कल वाढत असताना शाखाधिका-यांच्या ठिसाळ कारभाराचा फटका खातेदारांना बसत असुन ,ते सुविधा पुरविण्यात निष्क्रिय ठरत आहे त्यामुळे खातेदारन मध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बऱ्याच खातेदारांनी शाखाधिकारीं कच्छवे यांना ए. टी.एम सुविधा सुरू करण्याची मागणी करूनही ते दाद नसल्याने ग्राहक संतप्त होत आहेत.
मागील काही महिन्यांपासून सदर बँकेचा कारभार दलालाच्या ईशा-यावर चालत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. याकडे लक्ष वेधले असता एकीकडे शासन सुशिक्षित बरोजगांराना,नव व्यवसायीकांना विविध योजनांच्या माध्यमातून कर्ज वितरणासाठी योजना राबवित आहे.दुसरीकडे मात्र बँकेचे स्थानिक अधिकारी बेरोजगारांना नको तेवढ्या नियमबाह्य अटी लादुन शासनांच्या योजनांना खिळ बसवत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. मर्जीतील दलालांकरवी कोणत्याही अस्थापना नसताना कर्ज वाटप करण्यात येत असल्याचे देखील ऐकायला मिळाले आहे.सर्वत्र बँक आँनलाईन झाल्याने कर्ज प्रकरणात संचिका तयार करण्यासाठी तसेच खाते खोदणे केवायसी करणे आदीं आवश्यक बाबींसाठी बँकेच्या गेट मध्ये अधीका-यांच्या मर्जीतील काही दलालांनी आपली दुकाने थाटली आहेत. संबधीतांकडूनच ग्राहकांनी कागदोपत्र करुन घ्यावी असे बंधनकारक केले आहे. ते ग्राहकांकडून हजारों रुपय उकळत आहेत .बँक शाखेच्या प्रवेशद्वारावर खाजगी व्यक्तींना कागदपत्रे तयार करण्यासाठी कुणी परवानगी दिली.शाखाअधीकारीही याकडे दुर्लक्ष कसे काय करत आहेत.बँकेने संबंधितांना अधीकृत परवानाच दिला का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र बँक पूर्णा शाखेत ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आहे.मागील काही दिवसांपूर्वी शाखेत सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दोन महीला ग्राहकांना देखील लुबाडले होते.तसेच काही खासगी दलालांचा सुळसुळाट पहावयास मिळत आहे.बॅकेच्या वरीष्ठ अधीका-यांनी पूर्णा शहरातील शाखेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.