ठाणेदार हे वागणं बरं नव्हं;शेतकऱ्यांला ठाणेदाराकडून बुटाने मारण्याची धमकी

Spread the love

शेतकऱ्यांची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव; कार्यवाही करण्याबाबत दिले निवेदन

पूर्णा(प्रतिनिधी)- भावभावकीतील दोन शेतकऱ्यांचा. शेतीचा वाद न्यायप्रविष्ट असताना एका शेतकऱ्याची एकतर्फी बाजू ऐकून घेत दुसऱ्या शेतकऱ्याला पोलिस ठाण्यात बोलावून त्याचीं कोणतीही गोष्ट ऐकून न घेता त्यास लई माजलास असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बुटाने मारून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे.याप्रकरणी सदरील शेतकऱ्यांने जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांना एक निवेदन देऊन संबंधित ठाणेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनाचा लेखी इशारा देखील दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांना जर पोलीसांकडूनच अशा धमक्या मिळत असतील तर सुरक्षा कोण करणार ? असा प्रश्न चर्चीला जात आहे.
पूर्णा तालुक्यातील ताडकळस पासून ५ कि.मी. अंतरावरील कळगांव येथील शेतकरी जयप्रकाश (राजेश) सोनबा देवकते यांचा भावकीसोबत दिड एकर जमिनीचा अनेक वर्षापासून चालू आहे.जमीनीची मोजणी करून समोरच्या व्यक्तीकडे शेती निघून देखील तो शेती परत देत नसल्याने तो वाद आता न्याय प्रविष्ठ झाला आहे. या संदर्भात ताडकळस पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे यांनी जयप्रकाश देवकते यांना फोनवरुन पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. जमिनीचे सर्व कागदपत्रे घेऊन देवकते यांनी पोलीस ठाणे गाठले.आणि कागदपत्रे मोरे यांना दाखवित असतानाच त्यांचा अचानक पारा चढला. त्यांनी आरेरावीची भाषा करीत अर्वाच्च शिवीगाळ सुरू केली. हा वाद का करतोस, असे म्हणत बुटाने मारण्याची धमकीही दिली. ‘तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तुला १५ दिवसांच्या पोलीस कोठडीत टाकेल’, असे सज्जड धमकावले. यामुळे जयप्रकाश यांना दरदरुन घाम आला. विशेष म्हणजे यावेळी समोरची विरोधी पार्टी ही उपस्थित होती. त्यांच्या समक्ष अशी अर्वाच्च शिवीगाळ आणि धमक्या दिल्यामुळे व्यथीत झालेले जयप्रकाश देवकते यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपली वैâफीयत मांडत आंदोलनाचा इशारा देत एक निवेदन दिले आहे.निवेदनाची एक प्रत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पाठवली आहे.याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश बजावले आहेत

You cannot copy content of this page