जालन्यातील कैलास बोराडे यांना अमानुष मारहाण करण्यावर गुन्हे दाखल करा
पूर्णेत धनगर समाज बांधवांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
पूर्णा(प्रतिनिधी)
जालना जिल्ह्यातील रहिवासी कैलास बोराडे यांना महादेव मंदिरात का आला म्हणून अमानुष मारहाण करून चटके देणा-या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून तातडीने अटकेची कारवाई करण्याची मागणी येथिल धनगर समाज बांधवांनी केली असून, बुधवारी ता.५ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्णा तहसिलदारांमार्फत निवेदन दिले आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मौजे अन्वा येथे महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास गोविंदा बोराडे हे महादेवाच दर्शन घेण्यासाठी महादेव मंदिरातः गेले असता. तु आमच्या मंदिरात का आला म्हणून गावातील काही समाज कंटकांनी लोखंडी रोड ने जबर त्यांना जबर मारहाण केली. लोखंडी रॉड गरम करुन त्यांच्या शरीरावर चटकेही दिले.अशा प्रवृतीच्या लोकांना तात्काळ अटक करुन कठोर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा सर्व धनगर समाज बाधवांच्या वतीने तीव्र आदोलन करण्यात येईल असे धनगर समाज बांधवांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर मुंजाजी उर्फ अप्पा बनसोडे, विश्वनाथ होळकर,लक्ष्मण वैद्य, संतोष पारटकर, जगन्नाथ रेणगडे, कोंडीबा दळले आदीं शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.