सोशल मिडीया:एक अभासी जग,वेळीच मनाला आवर घाला- श्री. सोमनाथ वसंत शिंदे
पूर्णा (प्रतिनिधी)
सोशल मिडीया हे एक अभासी जग आहे, वेळीच मनाला आवर घालून आपली शैक्षणिक प्रगती करून आपल्या आई वडिलांची मान उंच करा.असे प्रतिपादन सहा.पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी केले आहे.
पूर्णा येथिल श्री. गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात “महिला सुरक्षितता, सायबर सिक्युरीटी आणि नविन कायदा” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूर्णा पोलिस ठाण्याचे सपोनि. सोमनाथ शिंदे, बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,मुलींनी समाज माध्यमापासुन शक्यतो दूर रहावे, मोबाईलचा वापर क्षैक्षणीक प्रगती साधण्यासाठी करावा,, दुष्कृत्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निर्भिडपणे तक्रार मांडायला शिका. तसेच त्यांनी सायबर सिक्युरीटी बद्दल माहिती देत. त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे ह्या विषयी माहिती दिली. तसेच नविन कायदा जो जुलै 2024 पासून लागू झाला आहे त्याबद्दलही माहिती दिली. ह्या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे सहसचिव प्रा. गोविंद कदम सर ह्यांची उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की , मुलींनी स्वतः सतर्क राहून स्वतःचे संरक्षण करावे.याविषयी मार्गदर्शन केले. ह्या कार्यशाळेसाठी श्री. गुरु बुद्धिस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. प्रमोदअण्णा एकलारे आणि सचिव श्री. अमृतराज कदम यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. संजय दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच दोन्ही उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे आणि डॉ. गजानन कुरुंदकर यांचेही मार्गदर्शन लाभले.पर्यवेक्षक श्री. उमाशंकर मिटकरी ह्यांची सुद्धा ह्या कार्यशाळेसाठी उपस्थिती लाभली. कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. डॉ. दिशा मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या समन्वयक प्रा. डॉ. अलका कौसडीकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. वृषाली आंबटकर यांनी केले. ह्या कार्यशाळेसाठी प्रा. डॉ. पुष्पा गंगासागर, प्रा. पुष्पा क्षीरसागर, प्रा. सारिका महाजन, प्रा. कदम मॅडम, प्रा. डॉ. स्मिता जमदाडे, प्रा. डॉ. रेखा पाटील, प्रा. डॉ. वर्षा धुतमल , प्रा. मीरा शेळके, प्रा. शीतल जाधव , प्रा. वैद्य सर, प्रा. मित्रे सर, प्रा. ढोणे सर, प्रा. डाखोरे सर ह्यांची उपस्थिती लाभली. ह्या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी गणेश सोळुंके. भगुसिंह ठाकूर यांनी परिश्रम घेतले.