भुयारी मार्गाच्या उतारावर ट्रॅक्टर उलटला..

Spread the love

पूर्णा टिपाईन्ट परिसरातील घटना;मोठा अनर्थ टळला;एका चारचाकीसह रस्त्यावरुन जाणारे पादचारी बालंबाल बचावले; रखडलेल्या रस्त्याचा परिणाम 

पूर्णा/प्रतिनिधी
येथून टिपाईन्ट परिसरात रखडलेल्या रस्त्याच्या कामाचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.सोमवारी १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतूकीचा एक ट्रॅक्टर अर्धवट रस्त्यावरुन खाली उतरताना दोन्ही ट्राॅल्या घेऊन उलटल्याची घटना घडली आहे.यावेळी या रस्त्यावरुन ट्रॅक्टर शेजारुन जात असलेली एक चारचाकी व काही महीला सुदैवाने बचावल्या आहेत.ऐन शहराच्या एन्ट्री वर कंत्राटदाराने रस्ता नाली बांधकाम थांबवले आहे.यामुळे येथे लहान मोठे अपघात  वारंवार घडत आहेत. सा.बां.विभाग एखाद  दोन जणांचे जीव गेल्यावर संबंधितावर कारवाई करणार आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
     पूर्णा टी पाईन्ट परिसरात सा.बां विभागाच्या वतीने रस्त्याचे सिमेंट काॅक्रेटीकरण व नाली बांधकाम हाती घेतले आहे.मागील काही महिन्यांपासून संबंधित कंत्राट कंपनीने हे काम पूर्णत्वास न नेता अर्धवट स्थितीत सोडून काम बंद केले होते.मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा नाली बांधकाम करण्यात येत आहे.शहरातुन नांदेड परभणी कडे जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते.त्यातच ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने परिसरातील बळीराजा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या उसाची संख्या देखील लक्षणीय आहे.टीपाईन्ट ते भुयारी मार्गाच्या उतारावर ऊसानी आदीं साहीत्यांनी भरलेली वाहने रस्त्यावरून  नेताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.परिसरात रस्तावर धुळीचे लोट उठत आहेत. नागीकांची वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.याबबात सा.बां.विभागाच्या अधिका-यांकडे अनेकांनी तक्रार करुनही रस्त्याचे काम पुर्णत्वास जात नसल्याने जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे.
      सोमवारी १३ जानेवारी रोजी दुपारी २ ते अडीच वाजण्याच्या सुमारास झिरोफाटा रस्त्याने बळीराजा साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर ट्राॅल्यासह एस्सार पंपासमोरील उतारावरुन भुयारी मार्गखाली जात असताना उलटल्याची घटना घडली आहे.दरम्यान ठिकाणाहून एक चारचाकी तसेच परिसरातील काही पादचारी महीला ट्रॅक्टर बाजुने जात होत्या मात्र ड्रव्हरच्या प्रसंगावधानामुळे ते सर्व बालंबाल बचावले आहेत.मात्र या घटनेत ट्रॅक्टर मधील ऊसाचा रस्त्यावर सडा पडला होता.घटनेत ट्रॅक्टर ट्राॅल्यां क्षती ग्रस्त होऊन मोठं नुकसान झाले तसेच शेतक-याच्या  उसाचे ही मोठ नुकसान झाले आहे.
       सरदील रस्त्यावर रखडलेले रस्त्याचे काम कंत्राटदार पुर्ण करणार नसेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून संबंधित  कंत्राटदारावर कारवाई करुन दुसऱ्या एजन्सी करवी सदरील काम पुर्णत्वास न्यावे असे जनमतातुन बोलले जात आहे.

You cannot copy content of this page