रब्बी हंगामासाठी येलदरी,सिद्धेश्वरचे पाणी सोडा-विशाल कदम

Spread the love

पूर्णा/(प्रतिनिधी)
येलदरी,सिध्देश्वर धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असुनही पाटबंधारे प्रशासनाने शेतीसिंचनासह पिण्याच्या पाण्याचे यंदाच्या मोसमात एकही आवर्तन सोडले नसल्याने रब्बी हंगाम संकटात सापडला आहे.पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपला मनमानी कारभार बाजुला ठेवून तातडीने शेती सिंचन व पिण्यसाठी पाणी सोडण्याची कारवाई करावी अशी मागणी ( शिवसेना ठाकरे गटाचे) जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी केली आहे.
परभणी-हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी, सिद्धेश्वर धरणांमध्ये सध्या १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यासोबतच परभणी जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये जायकवाडी धरणाचे पाणी शेतीला मिळत आहे. त्या धरणामध्येसुद्धा शंभर टक्के पाणीसाठा आहे. परंतु, शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असताना अधिकाऱ्यांनी ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना आगामी काळासाठी किती पाण्याचे आवर्तने मिळणार? रब्बीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना किती पाणी देण्यात येणार? यासंदर्भात कुठल्याच प्रकारचे नियोजन केले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील नियोजन कोलमडले असून, सध्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगामाचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये गव्हाची पेरणी करणे आवश्यक आहे. त्यासोबतच ज्वारीची पेरणी आवश्यक आहे. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचा म्हणजे आर्थिक आधार असलेल्या ऊस लागवडीचाही हंगाम सध्या सुरू होत आहे. परंतु, मागील दीड महिन्यापासून येलदरी, सिद्धेश्वर धरणांचे पाणी सोडण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्याच प्रकारचे नियोजन केले नाही. महिन्याची २० येऊन ठेपली असतानाही पूर्णा, वसमत तालुक्यांतील शेतकऱ्यांना पाण्यासंदर्भात रब्बीचा हंगाम धोक्यात त्यामुळे साध्या नोव्हेंबर कुठल्याच पूर्व सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.
लवकरच प्रश्न सोडविला जाईल.पाणी पाळी सोडण्याच्या आवर्तनासंदर्भात कार्यकारी अभियंता वसमत यांना विचारणा केली असता त्यांनी जिल्हा प्रशासनाला पाणी सोडण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे गेल्यानंतरच शेतीला पाणी सोडण्यासंदर्भात हालचाली केल्या जातील, असे मोघम उत्तर पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता (वसमत) यांनी दिले.
पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे मागील दीड महिन्यांपासून पूर्णा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बीचा हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली , येत्या चार ते पाच दिवसांमध्ये अधिकाऱ्यांनी येलदरी, सिद्धेश्वर धरणांमधून पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी सोडावे.अन्यथा पाटबंधारे विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page