शेत आखाड्याला आग; पशुधनाची हानी;शेत उपयोगी साहीत्याची राख

Spread the love

चार दोन शेळ्या,चार म्हशी,वगारुचा होरपळून मृत्यू; शेतकऱ्यांचे अडीच लाखांचे नुकसान

पूर्णा(प्रतिनिधी)
शेत आखाड्यावरील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहीत्यासह गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या,चार म्हशी,वगारुचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या समयी सुमारास बरबडी शिवारातील  पांगरा-पूर्णा रोडवरील बरबडी हनुमान मंदिरा जवळ घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनेत सदरील शेतकऱ्यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
  पूर्णा शहरापासून जवळच असलेल्या बरबडी शिवारातील पांगरा-पूर्णा रोडवरील बरबडी हनुमान मंदिर आहे . बाजुलाच गट क्रमांक ९५ मध्ये तालुक्यातील बरबडी येथील शेतकरी विलास मारोतराव सोलव,रामचंद्र मारोतराव सोलव या भावंडांची शेतजमीन आहे. गावापासुन शेत काही अंतरावर असल्याने शेतात विहीर, बोअरवेलसह सुसज्ज आखाडा बांधलेला आहे.या आखाड्यावरील गोठ्यात ते त्यांचे शेत उपयोगी साहीत्य तसेच पशूधन बांधत असत.दरम्यान शनिवारी २३ रोजी रात्री त्यांच्या मातोश्री कोंडाबाई सोलव यांचे निधन झाले असल्याने ते दोघे भावंड आखाड्यावरील गोठ्यात पशुधन बांधून गोठ्याला कुलूप लावून ते गावाकडे गेले होते. रविवारी दुपारी त्यांना त्यांचा आखाडा अचानक पेटला असल्याचे त परिसरातील शेतकऱ्यांकडून कळाले. परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला‌.ते आखाड्यावर पोहचे पर्यंत गोठ्यात बांधलेल्या चार दुभत्या म्हशी त्यांची पिल्ले तसेच दोन मोठ्या शेळ्यांचा आगीत होरपळून मृत्यू पावल्या होत्या.तसेच आखाड्यात असलेले शेत उपयोगी साहीत्य जळून खाक झाले.यात सोलव यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.पूर्णा पोलिस ठाण्याचे सपोउपनि आमेर चाऊस यांनी व सहका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.प्रशासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. आईचा अंत्यविधी उरकताच आखाडा जळून जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे शेतकरी सोलव यांच्यावर दुहेरी दुःख ओढावले गेल्याची चर्चा या ठिकाणी सुरू होती.

You cannot copy content of this page