मागील काही वर्षांत हे पहिल्यांदाच घडतेय.!कावलगांवच्या परिक्षा केंद्रावर काॅपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी
सिसीटीव्ही,ड्रोनची करडी नजर;डिवाएसपी डॉ.पाटलांकडूनही तपासणी
पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे कावलगांव येथील जय जवान जय किसान विद्यालयाच्या परिक्षा केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी सिसीटीव्ही कॅमेरा तसेच ड्रोनचा देखील वापर करण्यात येत असून याबाबत सत्यता तपासणी करिता दस्तुरखुद्द डिवाएसपी डॉ.समाधान पाटलांकडूनही तपासणी करण्यात आली.त्यामुळे मागील काही वर्षांत हे पहिल्यांदाच घडतेय असा प्रत्यय परिसरातील ग्रामस्थांना देखील येत आहे.
यंदा १० वी १२ वीच्या परिक्षांतील गैरप्रकार, सामुहिक काॅपी रोखण्यासाठी शासनाने काॅपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून,परिक्षांकाळात परिक्षा केंद्रावर सिसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात येत आहे.तर सामुहिक काॅपी आळा घालण्यासाठी परिक्षार्थ्यांसोबत, केंद्र प्रमुख ,सहा प्रमुख पर्यवेक्षक यांच्या वर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.शिवाय परिक्षेच्या काळात केंद्रात पारदर्शकता यावी यासाठी संबंधित विद्यालयातील संपूर्ण कर्मचारी शिक्षक यांना दुसऱ्या केंद्रावर पाठविण्यात आले आहे.
पूर्णा तालुक्यातील कावलगांव येथील जय जवान जय किसान विद्यालय म्हणजे पास होण्याची हमी असलेले परिक्षा केंद्र म्हणून ओळखले जाई.परंतु यंदा या केंद्रावर शिक्षण विभागाने बालाजी कापसीकर यांच्या नेतृत्वा खाली कडेकोट यंत्रणा राबविली आहे.तालुक्यात सर्वात जास्त विद्यार्थी असलेल्या या केंद्रावर ४७९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत केंद्रसंचालक म्हणून आबाजी खराटे, उपकेंद्र संचालक, डॉ. व्यंकटराव कदम सहाय्यक चंद्रकांत चाकोते, एस.टी. शेख.आदीं सहकारी सह काम पहात आहे. तसेच चुडावा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरसिंह पोमनाळकर हे जातीने पोलीस बदोबस्तावर लक्ष देत आहेत. इंग्रजी विषयाच्या पेपर दिवशी उपपोलीस उपविभागीय अधिकारी डाॅ. समाधान पाटील यांनी परीक्षा केंद्राला भेट देवून बंदोबस्ताची पाहणी केली. सर्वच परीक्षा हाँक भेट देवून मध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे,ड्रोन कार्यरत आहेत याची कहाणी केली. अनेक वर्षांपासून या केंद्रावर सर्रास कॉपीचालत असल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप येत असे मात्र यंदा काॅपी मुक्त अभियानांची कडक अंमलबजावणी होत असल्याने परिक्षा केंद्रावर शुकशुकाट पहावयास मिळत असल्याने येथिल ग्रामस्थही चक्रावले आहेत.पालक वर्गातुन समाधान व्यक्त केले जात आहे.