शेतकऱ्यांनी शाश्वतशेती उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे-रश्मी खांडेकर

Spread the love

पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कृषि मेळावा व शेतकरी परिसंवाद कार्यक्रम संपन्न

पूर्णा/प्रतिनिधी


शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय करुन शाश्वत शेती उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने एकत्रित येवुन प्रयत्न करावेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी केले.
     पूर्णा तालुक्यातील मौजे फुरकळस येथील शेतमळ्यात पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने गोविंदभाऊ दुधाटे यांच्या सहयोगाने (दि.२)जानेवारी रोजी कृषि मेळावा व शेतकरी परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर,तर प्रमुख पाहुणे कृषिभूषण कांतराव(काका)देशमुख झरीकर,हवामानतज्ञ पंजाबराव डख,प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विकास अधिकारी दिपक समाले,जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.नामदेव आघाव,पशुधन विकास अधिकारी निलेश देशमुख,शिक्षण अधिकारी संजय ससाणे,तहसीलदार पूर्णा माधवराव बोथीकर,बीडीओ मयुरकूमार आंदेलवाड,प्रताप काळे,जनार्धन आवरगंड गणपत शिंदे,यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी उपस्थिती मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.      
          कृषीभूषण कांतराव (काका) देशमुख झरीकर यांनी शेतीवरील उत्पन्न खर्च करून शेती फायद्याची कशी होईल या दृष्टीने मार्गदर्शन केले तसेच हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी हवामानाचा अंदाज घेवुन पिकांचे नियोजन करावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले. प्रमुख उपस्थित दिपक समाले कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद, परभणी शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसायीक दृष्टीकोन ठेवुन शेतीमधुन कायमस्वरुपी शाश्वत उत्पन्न पुरक व्यवसायाच्या माध्यमातून कसे घेता येईल याबाबत शेतकऱ्यांनी विचार करावा असे आपल्या मार्गदर्शनातून केले तर डॉ. निलेश देशमुख यांनी शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय करत असतांना जनावराचे चांगले आरोग्य, पोषक आहार, कृत्रिम रेतन, गोठ्याची स्वच्छता आणि जनावरांचे लसीकरण या पंचसुत्रीचा वापर केल्यास दुग्धव्यवसाय निश्चितच फायद्याचा ठरेल याबाबत पंचसुत्रीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवावे असे आपल्या मार्गदर्शनातून सुचविले. मान्यवरांच्या हस्ते पूर्णा तालूक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कृषिपूर्वक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साहेबराव शिंदे रा. ताडकळस यांनी तर कार्यक्रमाचे प्रस्तावित गोविंद दहिवडे कृषि अधिकारी, पंचायत समिती, पूर्णा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रगतशिल शेतकरी गोविंदभाऊ दुधाटे,वसंत विखे विस्तार अधिकारी,गजानन देशमुख, शिवाजी तोटेवाड तसेच जिल्हा परिषद कृषि विभाग परभणी अंतर्गत विविध तालूक्याचे कृषी विस्तार अधिकारी यांचे सहकार्य मिळाले तसेच रंगराव दुधाटे,शंकरराव काळबांडे, गंगाप्रसाद नावकीकर,संजय कुबडे,गजानन कुबडे,मन्मथ नावकीकर,माऊली सलगर इ. विशेष प्रयत्न केले.

You cannot copy content of this page