पुर्णा-पालम तालुक्याच्या हक्काचे पाणी नांदेडला..!
डिग्रस बंधा-यातील पाणी ११ मार्च रोजी सोडणार;परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा
पूर्णा(प्रतिनिधी )
पुर्णा-पालम तालुक्याच्या हक्काचे ३५.०८ दलघमी पाणी नांदेडकरीता सोडण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या असुन, दस्तुरखुद्द परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत एक प्रसिद्धी पत्रकात काढुन डिग्रस उच्च पातळी बंधा-यातील पाणी ११ मार्च रोजी नांदेड शहराकरीता सोडणार असल्याचे जाहीर केले आहे तसेच पूर्णा व पालम तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशाराही देऊ केला आहे.
पूर्णा- पालम तालुक्याच्या सिमेवर असलेल्या गोदावरी नदीवरील डिग्रस उच्च पातळी बंधा-यातुन परभणी जिल्हाधिकारी यांनी दि.३ मार्च रोजी एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले असून ११ मार्च रोजी योग्य त्या बंदोबस्तामध्ये सायं ६ ;४० वाजता ३५.०८ दलघमी एवढे पाणी नांदेड जिल्ह्यासाठी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर संगमा जवळ पालम तालुक्यातील दिग्रस येथे उच्च पातळी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली असून, दोन्ही तालुक्यातील एकूण २८ गावांतील सुमारे ५०० हेक्टर जमीन संपादित केली आहे बंधाऱ्याची पाणी पातळी क्षमता६३.८५ दलघमी एवढी असून बंधा-यातील ४० दलघमी पाणी हे दरवर्षी नांदेड जिल्ह्यासाठी देऊ केले जाते.यंदाही हे पाणी आरक्षित ठेवण्यात आलेले आहे. व ते दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर जेव्हा सगळीकडे पाणी टंचाई जाणवते तेव्हा खरी गरज असते ती पाण्याची व ही गरज असलेल्या वेळेमध्येच म्हणजेच ऐन टंचाई काळामध्ये सोडण्यात येते त्याचा परिणाम आजूबाजूच्या ग्रामीण भागातील खेडेगावांसह शहरांना सुद्धा भोगावा लागत आहे आपल्या हद्दीमध्ये साठवणूक करण्यात आलेले हक्काचे पाणी जर बाहेर जिल्ह्याला सोडण्यात येत असेल तर या हद्दीत वास्तव्य करून असलेल्या नागरिकांनी पाहण्यासाठी अन्य कुठे धावा करायचा परभणी जिल्ह्याच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या भरणाऱ्या मध्ये सर्वाधिक पाणीसाठा हा परभणी जिल्ह्यासाठीच आरक्षित असायला हवा परंतु धरण उशाला कोरड घशाला म्हणी प्रमाणे केवळ दलघमी फक्त २८.७७ दलघमी एवढेच पाणी परभणी जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना शिल्लक राहते.त्यामुळे पालम,पूर्णा, गंगाखेड तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.सदरील बंधा-याव-यातील पाणी साठ्यावर दोन तालुक्यांचा ७० % अधिकार असताना दरवर्षी प्रशासनान येथिल नदी काठच्या गावातील जनतेची गळचेपी करत खुशाल पाणी नांदेडला देत आहे.निसर्गाच्या लहरीपणा मुळे शेतीत शास्वती राहिली नाही ज्या ठिकाणी शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते त्याठिकाणी प्रशासन गळचेपी करत आहे
त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कोणाकडे दाद मागावी असा सवाल उपस्थित केला जात आहे.पालम व पूर्णा या दोन्ही तालुक्यांना हक्काचे पाणी नांदेडला दिल्याने भर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यांनी तातडीने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून सदरील पाणी थांबवावे अशी मागणी शेतकरी वर्गातुन होते आहे.