अवकाळीने काढले महावितरणचे वाभाडे; पूर्णा शहर ५ तासापासून अंधारात

Spread the love

दुरुस्तीची कामे करणा-या कंत्राटदाराचे पितळ उघडे; ऐनवेळी अधिकारी कर्मचाऱ्यांची दमछाक

पूर्णा/ प्रतिनिधी

ऐन रखरखत्या उन्हात आलेल्या अवकाळी पावसाने महावितरण कंपनीच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले असून, पूर्णा शहर व तालुका मागील ५ तासापासून अंधारात बुडाला आहे. मेन्टेनन्स (दुरुस्ती) चे काम करणाऱ्या कंत्राट दाराच्या थातुर मातुर कामाचे पितळ उघडे पडले आहे .त्यामुळे पडत्या पावसात वरिष्ठ अभियंत्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनाही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दमछाक करावी लागली तर बत्ती गुल झाल्याने उकाड्यात ग्राहकांना हाल सोसावे लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पूर्णा शहर व तालुक्याला गुरुवारी ता. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने अक्षरशः झडपून काढले .वादळी वाऱ्यांसह विजेच्या गडगडात सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला. या पावसात शहर व तालुक्याता विद्युत पुरवठा करणाऱ्या १३२ केवी केंद्रावरून विजेची बत्ती गुल झाल्याचे समजते .त्यामुळे पूर्णा शहरातील कोळीवाडा, आनंद नगर, मुख्य बाजारपेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ,पंचशील नगर, हरी नगर, सिद्धार्थ नगरफिडर पाच तासांपासून तर माटेगांव ,कातनेश्वर, चुडावा ,सारंगी, पिंपळा लोखंडे, कावलगांव ,ताडकळस आदीं ठिकाणचे ३३ केवीचे सब स्टेशन दोन ते तीन तास पूर्णतः बंद पडले होते.३ तासानंतर गावठाणचा वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला असल्याचे समजते. विज पुरवठा सुरळीत सुरू होण्यासाठी अजुन अर्धा ते पाऊण तास लागणार असल्याचे महावितरण कंपनीच्या सुत्रांनी कळवले आहे.प्रस्तुत प्रतिनिधींनी याबाबत महावितरणच्या उप कार्यकारी अभियंता अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहिती नुसार सध्या उन्हाची तीव्रता जास्त आहे. विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरील लग्ज, डिस्क पंचर झाल्यामुळे हा विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याचे प्राथमिक स्वरूपात त्यांनी सांगितले. विद्युत पुरवठा नेमका कशामुळे खंडित झाला वाहिनींवर कुठे तांत्रिक बिगड झाली हे पाहण्यासाठी, उपकार्यकारी अभियंता रामगीरवार सह अभियंता खरगे, ग्रामीण अभियंता वसमतकर , संपूर्ण लाईनस्टाप विजेची तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले.सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत वृत्त लिही पर्यंत तरी विद्युत पुरवठा पूर्णतः बंद पडला होता. महावितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजन व अधिका-यांच्या अनागोंदी कारभार पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महावितरण कंपनीने वीज वाहिन्यांचे दुरुस्तीकामे करण्यासाठी तालुक्याचे व शहराचे कंत्राट जारी केले आहे. या कंत्राटदाराने दुरुस्तीची थातूरमातूर कामे केल्याचा बेबनाव केला असल्याचे या एका पावसानंतर सिद्ध झाले.महावितरण चे लाखो रुपये खर्चूनही अचा अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे साडेचार ते पाच तास विद्युत पुरवठा खंडित झाला. विद्युत वाहिन्यांचे वेळीच योग्य मेनटन्स केले असते तर हा फटका महावितरणला तसेच ग्राहकांना बसला नसल्याचे जाणकारांचे मत आहे.आमच्या.

You cannot copy content of this page