पूर्णा तालुक्याला अवकाळीने झोडपले; वीज पडून २ जनावरे मृत्युमुखी,विवाह सोहळ्यात तारांबळ

Spread the love

लक्ष्मण नगर,ईस्माईपूर,आहेरवाडी येथील घटना;शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

पूर्णा(प्रतिनिधी)

सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने पूर्णा तालुक्याला शनिवारी सायं ५ वाजण्याच्या सुमारास अक्षरश; झोडपून काढले असून, लक्ष्मण नगर इस्माईलपुर येथे वीज पडल्याने शेत आखाड्यावरील दोन गोवंशीय जनावरे दगावले तर आहेरवाडी येथे विवाह सोहळ्याचा लग्न मंडप उडून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

मागील तीन चार दिवसापासून पूर्णा तालुक्यात अधून मधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे शुक्रवारी तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. शनिवारी दिवसभर उन्हाचा तडाका होता सायंकाळी चार वाजण्याच्या समस आकाशामध्ये काळे कुठे दाटून आले वादळ सदृश्य सोसाट्याचा वारा सुटला यावेळी मोठ्या प्रमाणात विजेचा गडगडाट झाला. तालुक्यातील आहेरवाडी लक्ष्मण नगर इस्माईलपुर पिंपळगाव बाळापुर आदी शिवारात मोठ्या प्रमाणात तास ते दीड तास जोरदार पाऊस झाला. आणि पावसात तालुक्यातील लक्ष्मण नगर येथील गंगाधर मुंजाजी आळसे या शेतकऱ्याची गाव पासून जवळच असलेल्या शिवारातील गट नं.०१ मधील शेत आखाड्यावरील लिंबाच्या झाडाखाली बांधलेली एक 70 हजार रुपये किमतीची गाय वीस पडून दगावलेली आहे सुदैवाने आखाड्याजवळ इतरत्र मानलेली दोन महेश व एक वासरू मात्र या विजेच्या झपाट्यापासून वाचले आहेत. तर तालुक्यातील ईस्माईलपूर येथे देखील सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. येथिल शेतकरी सुधाकर माघाडे यांच्या शेतीशिवार गट नं ४० मध्ये शेत आखाड्याजवळ वीज पडली.या त्यांचा सुमारे ४० हजार रुपये किंमतीचा गोवंश गो-हा वीज पडून दगावला आहे.

ता.१७ मे शनिवारी गोरज मुहूर्तावर अनेक ठिकाणी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आहेरवाडी येथे सुभाष दत्तराव मोरे यांच्या कन्येचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. विवाह सोहळ्यासाठी दुपारपासूनच जेवणाच्या अपंगती सुरू होत्या. दरम्यान सायंकाळी साडेचार वाजता सुमारास सोसाटच्या वारा विजेचा गडगड पावसाने जोरदार हजारी लावली यामध्ये विवाह सोहळ्यासाठी उभारण्यात आलेले लग्न मंडप अक्षरशः फाटून तुटून उडून गेले यामध्ये पाहुणेमंडळींसाठी आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीचाही खेळ खंडोबा झाला शेवटी कुटुंबीयांना या तारांबळीमध्ये महादेव मंदिरात सायंकाळी सात वाजता विवाह सोहळा उरवा लागला. विवाह सोहळ्यात संबंधित कुटुंबाचे तसेच लग्न सोहळ्यासाठी लग्न मंडपाचे मांडणी करणाऱ्या व्यवसायिकाची लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

मागील दोन ते तीन दिवसांत तालुक्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतो असल्याने शनिवारी कार्यालयात सुट्टी असुनही नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने तहसीलदार माधवराव बोथिकर, नाही नायब तहसिलदार प्रशांत थारकर तलाठी गणेश गोरे, सह आपापल्या सज्जावरील सज्ज ठेवले होते. तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती रात्री उशिरापर्यंत प्रशासनाचे कर्मचारी घेत असल्याचे समजते.

You cannot copy content of this page