माहेर,धानोरा (मो), गोविंदपुरात अवकाळी पावसासह विजेचा थयथयाट

Spread the love

चार जनावरे दगावली, फळबागांसह शेतपिके भाजीपाला सोलर पॅनलचे मोठे नुकसान,; महसूल कृषी विभागाचे पथक बांधावर

पूर्णा(प्रतिनिधी)

तालुक्यात गुरुवारी 3 एप्रिल रोजी पडलेल्या अवकाळी पावसाने फळबागासह शेती पिकांचे भाजीपाल्याचे तसेच शेतातील सोलार पॅनलचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर माहेर, धानोरा मोत्या , गोविंदपुर, दगडवाडी गावात वीज पडून, चार जनावरे दगावल्याची माहिती आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभाग व कृषी विभागाची पदके शेतकऱ्यांच्या बांधावर पोचली असल्याची माहिती आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्णा तालुक्याला गुरुवारी 3 एप्रिल रोजी अवकाळी पावसाने झोडपून काढले सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा विजेंचा गडगडात त्यातच वादळी पावसाला सुरुवात यामध्ये तालुक्यातील माहेर गोविंदपूर धानोरा मोत्या गावात वीज पडून दोन गोवंशीय तर एक महेश जातीचे वासरू दगावल्याची माहिती आहे. तर दगडवाडी गावात विजेची तार पडून बैल दगावल्याची माहिती आहे. त्यासोबतच ताडकळस मंडळ, कावलगांव मंडळ, पूर्ण मंडळ, चुडावा मंडळ, लिमला मंडळ मध्ये अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला. प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तालुक्यात 6. 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली आहे. या अवकाळी पावसामुळे जनावरांची हानी झाली असून त्यात माहेर येथील जत्रा माणिकराव पोड यांचा एक बैल, तर धानोरा मोत्या येथील नितीन मुंजाजी मोहीते यांचा एक बैल व गोविंदपुर येथे, गणपतराव देसाई यांची महेश वघार, विज पडल्याने दगावली तसेच दगडवाडी येथे विजेची तार बैलाच्या अंगावर पडून लक्ष्मण परसराम वाघमारे या शेतकऱ्याचा बैल दगावला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या उभ्या शेतात असलेल्या फळबागांना प्रामुख्याने संत्रा ,मोसंबी, पपई ,आंबा त्यासह भाजीपाला व काढणीस आलेल्या हळदीचे तसेच उन्हाळी ज्वारीचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी सकाळी महसूल विभाग प्रमुख तहसीलदार माधवराव बोथिकर यांच्या आदेशाने कृषी विभाग व महसूल विभागाचे तलाठी मंडळ अधिकारी, पशुवैद्यकीय विभाग यांचे संयुक्त पथक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहे. झालेल्या फळबाग व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत तर जीवित हानी झालेल्या जनावरांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे करण्यात येत असून, नैसर्गिक आपत्ती विभागामार्फत संबंधित शेतकऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे तातडीने मदत देणार असल्याचे तहसीलदार बोथिकरांनी कळवले आहे.

You cannot copy content of this page