ग्रामस्थांनीच रोखले माटेगांव-आहेरवाडी-वडगांव रस्त्याचे काम
कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याची तक्रार;सा.बां.विभागा अंतर्गत सुरु आहे प्रजिमा-१० रस्त्याचे काम
पूर्णा(प्रतिनिधी)
सुमारे १० कोटी रुपये खर्च करून तयार केल्या जाणाऱ्या माटेगांव-आहेरवाडी-वडगांव प्रजिमा-१० रस्त्याचे काम कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे करीत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनीच सा.बां विभागाविरोधात रोष व्यक्त करत रोखले आहे.
परभणी-हिंगोली जिल्हा जोडणाऱ्या पूर्णा तालुक्यातील प्रजिमा क्र.१० (नावकी-आहेरवाडी-वडगाव-रिधोरा) रस्ता , ३/०० ते ८/०० मध्ये मजबुतीकरण, काँक्रीटकरण,डांबरीकरण,कामाई ओढ्यातील पुल मो-यांसह साईडपट्टी आदीं सुधारणा करणे आदीं कामास १ डिसेंबर २०२३ मध्ये शासन निर्णय क्र. पी एल एन- २०२३/ सी आर ११५४/ शासन निर्णय ३ मंत्रालय मुंबई कडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.त्यानुसार संबंधित काम हे दोन टप्प्यांत विभागून यांचे कार्यारंभ आदेश पूर्णा व हिंगोली येथील कंत्राटदारास देण्यात आले आहे.मागील काही महिन्यांपूर्वी सदरील कामास प्रारंभ करण्यात आला.या कामात रस्त्यावर पडलेले खड्डे पुर्णतः खोदुन त्यात एम.पी.एम. ७५ मी.मी जाडीचा थरासह ओजिसी.२० मी.मी जाडीचा थर त्यात कारपेट,सिलकोट, करणे कढीण मुरुमाच्या साईड पट्टी भरुन सुमारे ६ इंची डमजबूत डांबरीकरण करुन रस्ता तयार करणे, पुलाच्या कामात १२०० मीमी.चे दोन सिडी पाईप टाकून बांधकाम करणे तसेच ७०० मीटर लांबीचे आहेरवाडी व वडगांव गावातुन सिमेंट काँक्रीटचा रस्ता त्यामध्ये ३०० मी.मी.कढीण मुरुम अंथरुन दबई करुन त्यावर २०० मी.मी.जाडीचे जिएसबी.१०० मीमी.जाडीचा डीएलसीतसेच पिक्युसी.३० मी.मी.थर तयारक करणे असे काम करावयाचे आहे.
सा.बां विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरील काम कंत्राटदारांकडून आपल्या प्रचलीत मापदंडानुसार करवून घेणे बंधनकारक होते.प्रत्यक्षात मात्र तसे होत नसल्याची ओरड परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. कंत्राटदार नियमाला फाटा देत अंदाज पत्रकानुसार काम न करता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून थातूरमातूर पद्धतीने काम करुन लाखों रुपये गिळंकृत करत आहे.याकडे आहेवाडी वडगांव,सुरवाडी येथिल ग्रामस्थांनी सा.बां विभागाचे लक्ष वेधले होते.मात्र विभागाचे स्थानिक अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
हा रस्ता दोन जिल्हास जोडणारा आहे शिवाय या भागात शेकडो ऊस उत्पादक शेतकरी असल्याने रस्ता मजबूत व उच्च प्रतिचा तयार करणे गरजेचे आहे.शासनाने या कामासाठी जवळपास १० कोटीं रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.मात्र संबंधित कामाचे कंत्राटदार राजकीय बळाचा वापर करून निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत.सोमवारी १४ एप्रिल रोजी संबंधित रस्त्यावर परिसरातील छगनराव मोरे , साहेबराव वाटोळे ,सुभाष मोरे, मनोहर खंदारे, दत्तराव भालेराव, नवनाथ घाटोळ,संभाजी मोरे,राम भालेराव,डिगंबर खंदारे, जगन्नाथ खंदारे, अनिल खंदारे,राजु खंदारे, आदीं शेकडो ग्रामस्थांनी रस्त्याचे रोखले.सदरील कामाची चौकशी करून काम उच्च प्रतिचे करुन द्यावे अशी मागणी केली स्थानिक सा.बां विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.