पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यास ३ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण

Spread the love

परभणी;स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा ईशारा

परभणी(प्रतिनिधी)
जिल्ह्यात २०२४ खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी मुळे सोयाबीन, कापूस, मुग, उडीद या सारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यात राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले.प्रधानमंत्री पीक विमा कंपनी व जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले. जिल्ह्यातील सर्वच महसुलमंडळ पंचवीस टक्के अग्रिम रक्कमेस पात्र ठरली असून देखील अद्यापही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.दरम्यान, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ता १८ जानेवारी २०२५रोजी पूर्णा तालूक्यातील धानोरा (काळे) येथील गोदावरी नदी पात्रात जल समाधी आंदोलन केले.स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिगरबाज कार्यकर्ते जिवमुठीत घेऊन तब्बल चार तास पाण्यात राहिल्या नंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणीच्या पालकमंत्री ना.मेघनाताई बोर्डीकर यांनी आंदोलकांना शब्द देत ” मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना बोलून राज्य सरकार कडे उर्वरित असलेली सबसिडी ९९ कोटी रुपये आठ दिवसात वर्ग करण्यास भाग पाडते आणि आठ दिवसात जिल्ह्यातील शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा होईल असा शब्द दिला होता”आज जल समाधी आंदोलन करन दहा ते अकरा दिवस झाले आहेत. तरीही अद्याप राज्य सरकारने सबंधीत पीक विमा कंपनीला ९९ कोटी रुपये थकीत असलेली सबसिडी दिलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा झालेला नाही. येत्या २२ फेब्रुवारी पर्यंत विमा द्यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना ३ फेब्रुवारी सोमवार रोजी पासून आमरण उपोषणास बसणार आहेत.अशा विषयाचे निवेदन जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजाधिक लोडे, माऊली शिंदे, प्रसाद गरुड यांनी २७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांना सादर करुन ईशारा देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page