चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय;ट्राॅफीवर तीस-यांदा कोरले नाव.!

Spread the love

महासमाचार न्युज नेटवर्क

चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडिया सध्याच्या स्पर्धेत अजूनही अपराजित राहिली आहे. रोहितसेनेने एकही सामना गमावलेला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात टॉस होताच भारतीय संघाने एक खास विक्रम रचला आहे.भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सलग तिसरा अंतिम सामना खेळत आहे. यापूर्वी, भारताने 2013 आणि 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामनाही खेळला होता. टीम इंडियापूर्वी कोणत्याही संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग तीन अंतिम सामने खेळता आले नव्हते. आता भारताने इतिहास रचला आहे. भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला आणि 2017 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला. आता चॅम्पियन्स ट्रॉफी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळली जात आहे.

भारताने दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

टीम इंडियाने आतापर्यंत दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. पहिला 2002 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नाही. या कारणास्तव, भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. यानंतर, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तेव्हा टीम इंडियाने इंग्लंडला पाच धावांनी हरवले होते

You cannot copy content of this page