पूर्णेत तिरंगा रॅली भारतमातेचा जयघोष ;शहीदांना अभिवादन
पूर्णा(प्रतिनिधी)
शहरात भारतीय सैन्याच्या शौर्याचा जयजयकार करण्यासाठी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत भारतमातेचा जयघोष करीत युद्धात विरमरण आलेल्या शहीदांना साश्रू नयनांनी श्रध्दांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारत-पाक युद्धामध्ये भारतीय सैन्याने जे शौर्य गाजवले ज्या जवानांना विरगती प्राप्त झाली.त्यांना अभिवादन करण्यासाठी पूर्णेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी रविवारी ११ में रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. याप्रसंगी शेकडो तरुण आपल्या दुचाकीस तिरंगा लाऊन हजर होते.ही रॅली झिरो टी पाईन्ट पासुन आनंद नगर चौक, महात्मा बसवेश्वर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,हजरत मस्तानशहावली दर्ग्यात अभिवादन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून युद्धात विरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी भारत माता की जय घोषणेने परिसर दणाणून गेला होता.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या सह डॉ. विनय वाघमारे, अँड .विशाल किरडे, जगदीश जोगदंड, लक्ष्मीकांत शिंदे,माजी सैनिक मन्नूसिंह ठाकूर , डॉ. गुलाब इंगोले,अमृतराज कदम, गणेश कदम,सुनील शिंदे, अंकित कदम,पंपटवार सर, दत्ता कदम, सचिन कदम,राम भालेराव ,अजय एकलारे,केशव कदम, कैलास मुळे अक्षय कहाते,राजु कदम ,विजय कदम सह शेकडो कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.असंख्य नागरिकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.