‘वंदे भारत’एक्सप्रेसच्या नांदेड पर्यंत विस्ताराचा मुहूर्त सापडेना..!

Spread the love

रेल्वे मंत्र्यांनी केलेली घोषणा हवेतच विरली का.? विस्तारासाठी नांदेड,परभणी,हिंगोलीकर आग्रही

पूर्णा(प्रतिनिधी)
मुंबई-जालना वंदेभारत एक्स्प्रेसचा विस्तार करुन ती नांदेड येथून चालवण्यात यावी या खा.डाॅ.अजित गोपछडे यांनी केलेल्या मागणीला रेल्वे मंत्र्यांनी हिरवी झेंडी दिली असे असतानाही रेल्वे प्रशासनाने अद्यापही ही गाडी नांदेड येथून चालवण्यासाठी कोणत्याही ठोस कारवाई केली नसल्याने रेल्वे मंत्र्यांनी केलेली घोषणा हवेतच विरली का..?असा सवाल प्रवाशी वर्गातुन होत आहे.संभाजीनगर करांचा या गाडीच्या विस्ताराला विरोध असला तरी नांदेड ,परभणी,हिंगोलीकर ‘वंदे भारत’च्या मुंबई प्रवासासाठी आग्रही आहेत.
मागील काही महिन्यांपूर्वीच जालना-मुंबई-जालना ‘वंदेभारत’एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती.नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नांदेडचे खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी ‘वंदेभारत’ एक्स्प्रेसचा नांदेड पर्यंत विस्तार व्हावा यासाठी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे विभागास वंदेभारत एक्स्प्रेस नांदेड येथून चालवण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.यासंदर्भात संबंधित विभागास सुचनाही दिल्या आहेत.रेल्वे प्रशासनाने याबाबत हलचाली देखील सुरू झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरहून नव्या रेल्वे सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागत असताना, हक्काची वंदे भारत  रेल्वे पळविल्या जात असल्याची ओरड स्थानिक प्रवासी, रेल्वे संघटनांतून होत आहे.परंतु परभणी, नांदेड, हिंगोली येथील प्रवाशी संघटनेने मात्र’वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या विस्ताराचे स्वागत केले आहे.संसदेच्या अधिवेशनाला महीन्याचा कालावधी लोटला आहे
रेल्वे मंत्र्यांनी वंदेभारतच्या विस्तासाठी प्रशासनाला सुचना देऊनही प्रशासन वंदे भारत एक्स्प्रेस नांदेड येथून सोडण्यास चालढकल पणा करीत आहेत.नांदेड रेल्वे विभागात येत्या काही दिवसांत महाव्यवस्थापक पहाणी दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी परभणी नांदेड हिंगोली येथील प्रवाशी संघटना महाव्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन देत चर्चा करणार असल्याचे समजते.

You cannot copy content of this page