चारचाकीच्या धडकेत दोघांचा उपचारादरम्यान मुत्यू
ताडकळस ता.२९/प्रतिनिधी
परभणीकडुन दुचाकीने गावाकडे परतणा-या एका दुचाकीला चारचाकी कारने दुचाकीला उडवण्याची घटना घडली होती.शनिवारी ता. २८ रोजी या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ऋषीकेश शिवराम सुर्यवंशी (वय २७) व शिवकुमार सुभाष ब्याळे (वय २४) दोघे रा. कळगाव ता.पूर्णा असं त्या मयत युवकांचे नांव आहेत.सदरील दोन्ही युवक हे परभणी येथून तास.१० जुन रोजी ऋषीकेशच्या मोटार सायकल क्र. (एमएच/२२/एटी/ ३०२४) वर बसुन रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गावाकडे परतत असताना तट्टू जवळा शिवारातील पुलाजवळ त्यांच्या दुचाकीस ताडकळस कडून येणाऱ्या कार क्र.(एमएच/०४/एचएक्स/१९५२) ने जोरदार धडक दिली.यात दुचाकीवरील दोघे अपघातात गंभीर जखमी झाले होते.दरम्यान त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले होते.उपचारा दरम्यान दोघांचाही ता.१७ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला.याप्रकरणी श्रृषिकेशचे वडील शिवराम सुर्यवंशी यांनी ताडकळस पोलीसांत ता.२८ रोजी कारचालकावर दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास ताडकळस पोलिस करत आहेत.