थकित पिक कर्जासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांची आत्महत्या
ताडकळस येथील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद
पूर्णा(प्रतिनिधी):
बँकेकडून घेतलेले लाख रुपयांचे पिक कर्ज दोन वर्षांपासून फिटत नसल्याने विवंचनेत सापडलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विषाचा घोट घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे घडल्याचे उघडकीस आले असून, ताडकळस पोलीस ठाण्यात मृत्यू प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
माणिकराव होनमणे वय ६० वर्षे रा.ताडकळस ता.पूर्णा असं त्या विष प्राशन केलेल्या शेतकऱ्यांचे नांव आहे.त्यांनी दोन वर्षांपूर्वी ताडकळस येथील महाराष्ट्र ग्रामीण बँके कडून दोन वर्षांपूर्वी एक लाख रुपयांचे पिक कर्ज घेतले होते.पिक कर्ज वसुली करीता बँक सतत तगादा लावत असल्याने डोक्यावर झालेले कर्ज कसे फेडावे या विवेंचनेतुन शुक्रवार १४ मे रोजी सकाळी उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले होते.त्यांना तात्काळ परभणी येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवार १६ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात माणिक होनमणे यांच्या खबरीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,४ मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते तुकाराम होनमणे व माणिक (बाळू) होनमणे यांचे वडिल होते. अधिक तपास सपोनि गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सुजलोड,पोते हे करीत आहेत.