मारोती कदम यांना ‘ आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार

Spread the love


पूर्णा(प्रतिनिधी)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथील उपक्रमशील शिक्षक मारोती भुजंगराव कदम यांना साहित्य क्षेत्रात अल्पावधीत केलेल्या लक्षवेधी साहित्यिक योगदानाची नोंद घेवून काव्यमित्र संस्था , पुणे मार्फत दिला जाणारा आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार जाहिर केला आहे . असे काव्य मित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर यांनी कळवले आहे . सदर पुरस्कार पुणे येथे हेणाऱ्या आचार्य अत्रे स्मृतिदिन समारंभात प्रदान करण्यात येणार आहे .

मारोती कदम यांनी आजतागयत फोर्थ अंपायर (वैचारिक लेख संग्रह ) वक्ता ते प्रवक्ता , वंचितांचा मुक्तिदाता – डॉ बाबासाहेब आंबेडकर , बहुजनांचा दीपस्तंभ – डॉ . बाबासाहेब आंबेडकर , प्रज्ञांकुर (भीमजयंती विशेषांक ) संघनायक -भदंत पय्याबोधी इत्यादी संदर्भ साहित्य प्रकाशित झाले असून मास्तर आवगो रे आणि महाएल्गार ( प्रातिनिधिक कविता संग्रह ) प्रकाशनाच्या वाटेवर आहे . गेल्या पंचविस वर्षापासून सातत्याने अग्रगण्य दैनिकांतून शैक्षणिक , साहित्यिक, सामाजिक प्रश्नांवर विपूल प्रमाणात स्तंभलेखक म्हणून दिशादर्शक लेखन केल्याची दखल घेऊन यापूर्वी देखील त्यांना स्मृतिशेष बबन जोगदंड सम्राट भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर , मुख्याध्यापक विठ्ठल रिठे , केंद्रप्रमुख उमाकांत देशटवार, आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .

You cannot copy content of this page