महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा वर्धापन दिन साजरा
नांदेड (प्रतिनिधी)
महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा 46 वा वर्धापन दिन ता. 25 रोजी नांदेड येथे संस्थेच्या अध्यक्षा सौ. चंद्रकला कदम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेची स्थापना महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी 1979 रोजी संस्थापक अध्यक्ष अणसाजीराव गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली केली. आज रोजी संस्थेचे 600 सभासद असून संस्थेचे भागभांडवल रु.6.5 कोटी आणि गंगाजळी रु.5 कोटी आहे. संस्थेकडे रु. 13 कोटींच्यावर ठेवी जमा आहेत. संस्थेने सभासदांना 22 कोटींचे कर्जवाटप केले आहे. नांदेड जिल्ह्य़ातील ही कायम ऑडिट वर्ग ‘अ’ असलेली प्रगतिशील संस्था आहे. संस्थेने आपल्या सर्व सभासदांचा रु. 20 लक्ष रकमेचा अपघात विमा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे काढलेला आहे. अपघातात मृत्यू पावलेले संस्थेचे तरुण सभासद कै. अभिजित ढोके यांचा विमा युनायटेड ईंडिया ईन्शुरन्स कंपनीने मंजूर केला असून ती रक्कम चेकने दिवंगत सभासदाचे वारस प्रिया अभिजीत ढोके यांना देण्यात आली. याच कार्यक्रमात बँकेत पदोन्नती झालेले संस्थेचे संचालक श्री माधव पालेपाड आणि श्री हर्षल देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री सचिन जाधव,सर्व संचालक,कर्मचारी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे श्री गणेश कदम,श्री गौरव देशमुख इ.उपस्थित होते.